शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पावसाचं रौद्र रूप, काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 16:07 IST

रत्नागिरी, दि. 19 - रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणा-या पावसाने आज रौद्र रुप धारण केले आहे. अतिवृष्टी आणि ...

रत्नागिरी, दि. 19 - रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार कोसळणा-या पावसाने आज रौद्र रुप धारण केले आहे. अतिवृष्टी आणि खवळलेला समुद्र यामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे तीन बोटी बुडाल्या आहेत. सुदैवाने स्थानिकांच्या सहकार्याने त्या बोटींवरील सर्व खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. पण समुद्रात काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती  व्यक्त केली जात आहे. 

खवळलेल्या समुद्रामुळे आंजर्ले खाडीत तीन  बोटी बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. बोटीवरील 10 जणांना स्थानिकांनी वाचविले आहे. त्याचदरम्यान सुवर्णदुर्ग किल्याशेजारी एक बोट खडकावर आदळून फुटली आहे. सुदैवाने त्यात कोणीही नव्हते. समुद्रात काही बोटी व मच्छिमार अडकल्याची भीती  व्यक्त केली जात आहे.          

या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. दापोली तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून, हर्णेतील बाजार मोहल्यात अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. अतिवृष्टीमुळे  दापोली तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. समुद्रात  वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे 700 मच्छिमार बोटींनी किनारा गाठला आहे.