शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

रक्षाबंधन..... गोड बंधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST

बहीण-भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण अर्थात रक्षाबंधन! भारतीय संस्कृतीमध्ये भैय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने साजरा ...

बहीण-भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण अर्थात रक्षाबंधन! भारतीय संस्कृतीमध्ये भैय्यादूज किंवा रक्षाबंधन या नावाने साजरा करण्यात येतो. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावासाठी दीर्घायुष्य व सुख लाभो, मिळो म्हणून प्रार्थना करतात. भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. वास्तविक एकमेकांना जोडणारा असा हा सण आहे. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते, असा समाज सामर्थ्यशाली बनतो हा संदेशही राखी पौर्णिमेद्वारे दिला जाऊ शकतो.

द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठविलेले राखीचे ताट असो वा श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठविलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय, या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावा-बहिणींचे परस्परांवरील प्रेम. स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली, तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून सुचवत असते. यात तिचा दुबळेपणा नसून, भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे भाऊ, बहीण असोत किंवा मानलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनच राखी पौर्णिमा साजरी केली जात असावी. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री ही चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. इंटरनेट, मोबाईल किंवा स्मार्टफोनमुळे जग कितीही जवळ आले असले तरी परगावी राहणाऱ्या भावाला पोस्टाने किंवा कुरिअरने आवर्जून राखी पाठविली जाते.

काळानुरूप रक्षाबंधनाचा सण केवळ कुटुंबीयांपुरता मर्यादित राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमीही झाडांना राख्या बांधून त्यांच्या ‘जतन व संवर्धनाचा’ संदेश देतात. तसेच शाळांमधून मोठ्या प्रमाणावर राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांनाही पाठविल्या जातात. काही कुटुंबीय किंवा मित्र परिवार कारागृह, मनोरुग्णालय, तसेच बालसुधारगृहे, निरीक्षणगृहे, अनाथाश्रमात जाऊन तेथील मंडळीना राख्या बांधतात. एकूणच ‘सामाजिक बांधीलकी’ जपण्याचे काम केले जाते. काही शाळांतील विद्यार्थिनी पोलीस बांधवांनाही राख्या बांधून सण साजरा करतात.

प्रत्येकाची आवड ही निरनिराळी असते. बाजारात सध्या विविध प्रकारच्या राख्या विक्रीस उपलब्ध आहेत. शहरात राख्यांनी नटली आहेत. काही दुकानदारांनी तर राख्यांचे दालनच उघडले आहे. युवती, महिलांची राख्यांसाठी गर्दी होत असलेली दिसून येते.

ग्रामदैवतचं पोवतं

घरोघरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येत असला तरी ग्रामदेवतेला राखीपौर्णिमेला पोवतं बांधलं जातं. पुजारी पोवती तयार करून ग्रामदेवतेला बांधतात. त्यानंतर घरोघरी ही पोवती वाटण्यात येतात. पुरुष मंडळी पोेवतं हातात बांधतात किंवा गळ्यात घालतात. ग्रामदेवतेला रक्षाबंधनादिवशी पोवतं अर्पण केल्यानंतर हा सण साजरा करण्यात येतो. आजही घरात अधिकच्या राख्या खरेदी करण्यात येतात. त्यातील एक राखी घरातील देव्हाऱ्यात ठेवण्याची प्रथा आहे. नंतरच घरातील मंडळींना राखी बांधली जाते.