शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

राजेश सावंत भाजपच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये अनेक समर्थकांसह येत्या काही दिवसात भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सेना व राष्टÑवादीतील अन्य मंडळीही भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आता केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरीत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये अनेक समर्थकांसह येत्या काही दिवसात भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सेना व राष्टÑवादीतील अन्य मंडळीही भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आता केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरीत येत्या काही दिवसात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे पुरते पानिपत झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील भाजप भक्कम करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना पक्षाध्यक्ष अमित शहा व प्रदेश भाजपकडून आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या या सूचनेनुसार २१ आॅगस्टला चिपळूणमध्ये झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत चिपळूण व संगमेश्वर तालुका भाजप अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे नेते व कार्यकर्त्यांची भाजपला गरज आहे, तर सेना व राष्टÑवादीत समाधानी नसलेल्या काही नेत्यांना व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये जाण्याची घाई आहे.राजेश सावंत हे सध्या रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष आहेत. त्यांना हे पद केवळ एका वर्षासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येते. सामंत यांच्याबरोबर राहून राजेश सावंत यांचा राजकीयदृष्ट्या काहीच फायदा झाला नसल्याची भावना सावंत यांच्या समर्थकांमध्ये आहे. सातत्याने सावंत यांचे नेतृत्व चेपण्याचाच प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच राजेश सावंत यांनी सेनेतून बाहेर पडावे व भाजपमध्ये प्रवेश करावा, ही त्यांच्या समर्थकांची भूमिका आहे. त्यातूनच राजेश सावंत यांचा भाजप प्रवेशाचा मुद्दा पुढे आला आहे.दुसरीकडे राष्टÑवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरात अनेक विकासकामे केली आहेत. रत्नागिरी शहराला चांगले रुप देण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला आहे, अशी नागरिकांची भावना आहे. राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रत्नागिरी तालुक्यात काहीसा कमकुवत झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यास आपल्या कर्तृत्त्वाला पुन्हा झळाळी मिळेल, अशी चर्चा शेट्ये यांच्या गोटात सुरू आहे. भाजपमध्ये आणखी कोण जाणार, याचीही चर्चा आहे.