शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

राजेश सावंत भाजपच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये अनेक समर्थकांसह येत्या काही दिवसात भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सेना व राष्टÑवादीतील अन्य मंडळीही भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आता केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरीत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये अनेक समर्थकांसह येत्या काही दिवसात भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सेना व राष्टÑवादीतील अन्य मंडळीही भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आता केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरीत येत्या काही दिवसात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे पुरते पानिपत झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील भाजप भक्कम करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना पक्षाध्यक्ष अमित शहा व प्रदेश भाजपकडून आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या या सूचनेनुसार २१ आॅगस्टला चिपळूणमध्ये झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत चिपळूण व संगमेश्वर तालुका भाजप अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे नेते व कार्यकर्त्यांची भाजपला गरज आहे, तर सेना व राष्टÑवादीत समाधानी नसलेल्या काही नेत्यांना व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये जाण्याची घाई आहे.राजेश सावंत हे सध्या रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष आहेत. त्यांना हे पद केवळ एका वर्षासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येते. सामंत यांच्याबरोबर राहून राजेश सावंत यांचा राजकीयदृष्ट्या काहीच फायदा झाला नसल्याची भावना सावंत यांच्या समर्थकांमध्ये आहे. सातत्याने सावंत यांचे नेतृत्व चेपण्याचाच प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच राजेश सावंत यांनी सेनेतून बाहेर पडावे व भाजपमध्ये प्रवेश करावा, ही त्यांच्या समर्थकांची भूमिका आहे. त्यातूनच राजेश सावंत यांचा भाजप प्रवेशाचा मुद्दा पुढे आला आहे.दुसरीकडे राष्टÑवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरात अनेक विकासकामे केली आहेत. रत्नागिरी शहराला चांगले रुप देण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला आहे, अशी नागरिकांची भावना आहे. राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रत्नागिरी तालुक्यात काहीसा कमकुवत झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यास आपल्या कर्तृत्त्वाला पुन्हा झळाळी मिळेल, अशी चर्चा शेट्ये यांच्या गोटात सुरू आहे. भाजपमध्ये आणखी कोण जाणार, याचीही चर्चा आहे.