शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

By मनोज मुळ्ये | Updated: April 15, 2023 12:09 IST

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

रत्नागिरी : ज्यावेळी मी राजापूर - लांजा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, त्याचवेळी मी शपथ घेतली होती की जिंकलो किंवा हरलो तरी मरेपर्यंत याच मतदार संघासाठी कार्यरत राहीन. त्यामुळे मी अन्य कोणत्या मतदार संघातून लढण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. रत्नागिरी ही आपली जन्मभूमी आहे. शिवसेनेमुळे आपल्याला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. 

२००६ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपण राजापुरातून प्रथम निवडणूक लढवली. त्याचवेळी आपण तिथल्या मातीची शपथ घेतली आहे. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून काम सुरू ठेवले. त्यामुळेच २००९, २०१४ आणि २०१९ ला मतदारांनी मला निवडून दिले. आता मतदार संघ बदलण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

पक्षाने आदेश दिल्यास जबाबदारी घेणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, पक्षादेशाला मी बांधिल आहे. पण जिथे मी आतापर्यंत निवडणूक जिंकलो आहे, जिथे मतदारांना जिंकले आहे, जिथे मी पक्ष वाढवला आहे, तिथेच मला पक्षप्रमुख संधी देतील, याबाबत मला विश्वास आहे. देशातील तपास यंत्रणांचा कितीही वापर झाला तरी महाविकास आघाडी त्याला बधणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवी