शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

By मनोज मुळ्ये | Updated: April 15, 2023 12:09 IST

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

रत्नागिरी : ज्यावेळी मी राजापूर - लांजा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, त्याचवेळी मी शपथ घेतली होती की जिंकलो किंवा हरलो तरी मरेपर्यंत याच मतदार संघासाठी कार्यरत राहीन. त्यामुळे मी अन्य कोणत्या मतदार संघातून लढण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. रत्नागिरी ही आपली जन्मभूमी आहे. शिवसेनेमुळे आपल्याला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. 

२००६ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपण राजापुरातून प्रथम निवडणूक लढवली. त्याचवेळी आपण तिथल्या मातीची शपथ घेतली आहे. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून काम सुरू ठेवले. त्यामुळेच २००९, २०१४ आणि २०१९ ला मतदारांनी मला निवडून दिले. आता मतदार संघ बदलण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

पक्षाने आदेश दिल्यास जबाबदारी घेणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, पक्षादेशाला मी बांधिल आहे. पण जिथे मी आतापर्यंत निवडणूक जिंकलो आहे, जिथे मतदारांना जिंकले आहे, जिथे मी पक्ष वाढवला आहे, तिथेच मला पक्षप्रमुख संधी देतील, याबाबत मला विश्वास आहे. देशातील तपास यंत्रणांचा कितीही वापर झाला तरी महाविकास आघाडी त्याला बधणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवी