शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मरेपर्यंत 'याच' मतदार संघासाठी काम करणार, राजन साळवींची स्पष्ट भूमिका

By मनोज मुळ्ये | Updated: April 15, 2023 12:09 IST

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.

रत्नागिरी : ज्यावेळी मी राजापूर - लांजा मतदार संघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, त्याचवेळी मी शपथ घेतली होती की जिंकलो किंवा हरलो तरी मरेपर्यंत याच मतदार संघासाठी कार्यरत राहीन. त्यामुळे मी अन्य कोणत्या मतदार संघातून लढण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मंत्री उदय सामंत यांच्यासमोर उद्धव ठाकरे शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदर साळवी यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. रत्नागिरी ही आपली जन्मभूमी आहे. शिवसेनेमुळे आपल्याला नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख अशा पदांवर काम करण्याची संधी मिळाली. 

२००६ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपण राजापुरातून प्रथम निवडणूक लढवली. त्याचवेळी आपण तिथल्या मातीची शपथ घेतली आहे. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. पण खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून काम सुरू ठेवले. त्यामुळेच २००९, २०१४ आणि २०१९ ला मतदारांनी मला निवडून दिले. आता मतदार संघ बदलण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

पक्षाने आदेश दिल्यास जबाबदारी घेणार का, असा प्रश्न करण्यात आला असता ते म्हणाले की, पक्षादेशाला मी बांधिल आहे. पण जिथे मी आतापर्यंत निवडणूक जिंकलो आहे, जिथे मतदारांना जिंकले आहे, जिथे मी पक्ष वाढवला आहे, तिथेच मला पक्षप्रमुख संधी देतील, याबाबत मला विश्वास आहे. देशातील तपास यंत्रणांचा कितीही वापर झाला तरी महाविकास आघाडी त्याला बधणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवी