शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मुंबईत आरक्षण लढा उभारावा : झेपले

By admin | Updated: January 29, 2015 00:05 IST

२५ हजार लोकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे काढण्यात आला. मात्र,

देवरुख : मुंबईत असलेल्या कुणबी समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन प्रचंड लढा मुंबईत उभा करावा, असे आवाहन कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपीनाथ झेपले यांनी परळ येथील मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली १२ आॅगस्ट २०१४ रोजी २५ हजार लोकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील एकही आमदार कुणबी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलत नाही. म्हणूनच, आपला लढा मुंबईत उभा करणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन मेळाव्यात एक अस्थायी कमिटी मुंबईत निर्माण करण्यात आली.निमंत्रक म्हणून विकास नारकर यांची तर सदस्य म्हणून रमेश काजरेकर, ज्ञानेश्वरा घेवडे, मनोहर डोंगरे, चंद्रकांत पाष्टे, दत्ताराम बंडबे, संतोष पातेरे, कमलकार घवाळी, भरत घाणेकर, किरण प्रिंदावणकर, उमेश धामणे, अमित लाखण, मोरेश्वर पाष्टे, संतोष पाष्टे, दत्ताराम साप्ते, दिपक जाधव, रमेश आगरे, रामचंद्र गोताड, अनंत जुवळे, संजय घडशी, विठोबा डोंगरे याची नेमणूक करण्यात आली. मुंबईतील कुणबी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक उपनगरात संघर्ष समिती निर्माण करुन, काम उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात मंडणगड येथील राजेश धामणे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विकास नारकर यांनी केले तर आभार संतोष पातेरे यांनी मानले. (प्रतिनिधी)