शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पावसाळी वातावरणाचा शेतकऱ्यांमध्ये धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी वारे, पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्मोहोर, थ्रिप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले. मार्चपासून आंबा सुरू झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत पीक निम्यापेक्षा कमी आहे. शिवाय दरही नसल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा सर्व खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस कमाल तापमान ३४ अंश असले तरी मधूनच आभाळ दाटून येत आहे. पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार होत आहे. मात्र मध्येच वातावरण निवळत आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

सध्या वाशी मार्केटमध्ये १००० ते २५०० रुपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला तरी उत्पादनासाठी एकूण येणारा खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कोकणातून ४० ते ४५ हजार, अन्य राज्यातून २५ ते ३० हजार क्रेट विक्रीसाठी येत आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. उत्पादन कमी असताना दरही घसरलेले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्यावर झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकऱ्यांना किलोवर घालावा लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

..................................

हापूस उत्पादन कमी असताना दर स्थिर राहणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने शेतकऱ्यांना खते, कीटकनाशकांची बिले, इंधन खर्च, मजुरी इत्यादी विविध खर्च भागविणे जिकिरीचे होणार आहे. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यातच पावसाळासदृश वातावरणामुळे शेतकरी आंबा काढण्याच्या तयारीत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पुन्हा नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी