शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

पावसाळी वातावरणाचा शेतकऱ्यांमध्ये धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी वारे, पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्मोहोर, थ्रिप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले. मार्चपासून आंबा सुरू झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत पीक निम्यापेक्षा कमी आहे. शिवाय दरही नसल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा सर्व खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस कमाल तापमान ३४ अंश असले तरी मधूनच आभाळ दाटून येत आहे. पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार होत आहे. मात्र मध्येच वातावरण निवळत आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

सध्या वाशी मार्केटमध्ये १००० ते २५०० रुपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला तरी उत्पादनासाठी एकूण येणारा खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कोकणातून ४० ते ४५ हजार, अन्य राज्यातून २५ ते ३० हजार क्रेट विक्रीसाठी येत आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. उत्पादन कमी असताना दरही घसरलेले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्यावर झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकऱ्यांना किलोवर घालावा लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

..................................

हापूस उत्पादन कमी असताना दर स्थिर राहणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने शेतकऱ्यांना खते, कीटकनाशकांची बिले, इंधन खर्च, मजुरी इत्यादी विविध खर्च भागविणे जिकिरीचे होणार आहे. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यातच पावसाळासदृश वातावरणामुळे शेतकरी आंबा काढण्याच्या तयारीत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पुन्हा नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी