शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी वातावरणाचा शेतकऱ्यांमध्ये धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी वारे, पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्मोहोर, थ्रिप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले. मार्चपासून आंबा सुरू झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत पीक निम्यापेक्षा कमी आहे. शिवाय दरही नसल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा सर्व खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस कमाल तापमान ३४ अंश असले तरी मधूनच आभाळ दाटून येत आहे. पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार होत आहे. मात्र मध्येच वातावरण निवळत आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

सध्या वाशी मार्केटमध्ये १००० ते २५०० रुपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला तरी उत्पादनासाठी एकूण येणारा खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कोकणातून ४० ते ४५ हजार, अन्य राज्यातून २५ ते ३० हजार क्रेट विक्रीसाठी येत आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. उत्पादन कमी असताना दरही घसरलेले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्यावर झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकऱ्यांना किलोवर घालावा लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

..................................

हापूस उत्पादन कमी असताना दर स्थिर राहणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने शेतकऱ्यांना खते, कीटकनाशकांची बिले, इंधन खर्च, मजुरी इत्यादी विविध खर्च भागविणे जिकिरीचे होणार आहे. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यातच पावसाळासदृश वातावरणामुळे शेतकरी आंबा काढण्याच्या तयारीत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पुन्हा नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी