शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

पावसाळी वातावरणाचा शेतकऱ्यांमध्ये धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल असताना अचानक हवामानात बदल होऊन पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. वादळी वारे, पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्मोहोर, थ्रिप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले. मार्चपासून आंबा सुरू झाला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत पीक निम्यापेक्षा कमी आहे. शिवाय दरही नसल्याने शेतकऱ्यांचा खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा सर्व खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस कमाल तापमान ३४ अंश असले तरी मधूनच आभाळ दाटून येत आहे. पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार होत आहे. मात्र मध्येच वातावरण निवळत आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

सध्या वाशी मार्केटमध्ये १००० ते २५०० रुपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला तरी उत्पादनासाठी एकूण येणारा खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहे. कोकणातून ४० ते ४५ हजार, अन्य राज्यातून २५ ते ३० हजार क्रेट विक्रीसाठी येत आहेत. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्मीच आहे. उत्पादन कमी असताना दरही घसरलेले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्यावर झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकऱ्यांना किलोवर घालावा लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

..................................

हापूस उत्पादन कमी असताना दर स्थिर राहणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने शेतकऱ्यांना खते, कीटकनाशकांची बिले, इंधन खर्च, मजुरी इत्यादी विविध खर्च भागविणे जिकिरीचे होणार आहे. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्यातच पावसाळासदृश वातावरणामुळे शेतकरी आंबा काढण्याच्या तयारीत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वादळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पुन्हा नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

- राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी