शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

रत्नागिरीत पावसाचा जोर; चोरद नदीला पूर

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

रत्नागिरी : जून महिन्यात गायब झालेल्या पावसाने श्रावणाच्या प्रारंभापासूनच जोर धरला आहे.

रत्नागिरी : जून महिन्यात गायब झालेल्या पावसाने श्रावणाच्या प्रारंभापासूनच जोर धरला आहे. आज, बुधवारचे सकाळचे सत्र पूर्ण कोरडे गेल्यानंतर दुपारच्या सत्रात काही जोरदार सरी कोसळल्याने जूनचा राहिलेला कोटा आता तो पूर्ण करणार, असे चित्र दिसत आहे. दरम्यान, खेडमध्ये चोरद नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.श्रावण सुरू होताच पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. पाऊस शांतपणे पडत असला तरी वाऱ्याचा जोर अधिक असल्याने जिल्ह्यात पडझडीच्या घटना घडत आहेत. आज दुपारपर्यंत मळभ दाटले असले तरी पाऊस पडला नव्हता. दुपारच्या सत्रात मात्र पावसाने जोर धरला. सायंकाळच्या सत्रात शांत झालेला पाऊस रात्री पुन्हा जोरदार कोसळला.या पावसात संगमेश्वर तालुक्यात एका घराचे ९०० रुपयांचे नुकसान झाले असून, मंडणगड येथे एका घराचे ४,१०० रुपयांचे नुकसान झाले आहे. देवरुख येथे २८ रोजी एका गोठ्याचे १ लाख ३९ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले असून, एक गाय आणि एक बैल मृत झाल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय एका घराचे ५३०० रुपयांचे किरकोळ नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)