शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

पावसाचे थैमान, मोठे नुकसान

By admin | Updated: July 12, 2014 00:38 IST

रत्नागिरी शांत : संगमेश्वर, देवरूखला पावसाने झोडपले, नद्यांमध्ये पाणी

रत्नागिरी : जवळजवळ महिन्याभराची प्रतीक्षा करायला लावून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आगमन करताना जिल्ह्याला चांगलाच दणका दिला आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. दापोलीमध्ये चार दिसांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह भोपण खाडीमध्ये सापडला आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका देवरूख, संगमेश्वरला बसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूण, खेड, मंडणगडलाही दमदार पाऊस सुरू होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला मात्र पावसाने दिलासा दिला. गुरूवारी दुपारनंतर पावसाला सुरूवात झाली. थोडी-थोडी विश्रांती घेत पाऊस अजून सुरूच आहे. (प्रतिनिधी)देवरुख : आज देवरूख, संगमेश्वर परिसराला पावसाने झोडपून काढले. देवरुख बाजारपेठेतील जुनाट वटवृक्ष कोसळून त्याखाली एक रिक्षा, दोन मोटारसायकल आणि तब्बल २४ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमेश्वर रिक्षा स्टँडजवळ जुनाट वृक्ष कोसळून मुंबई - गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प होती. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या पावसाने देवरूख परिसरात ४७ लाख १९ हजार रूपयांचे नुकसान झाल्याबाबतचा पंचनामा देवरूख महसूलने केला आहे.देवरूख येथील महाकाय वटवृक्ष दूर करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. त्यात महेश जागुष्टे (ओझरे खुर्द), संतोष शिगवण (निवे बुद्रुक), सोमा जाधव (कुडवली) यांना किरकोळ दुखापत झाली. संगमेश्वरमध्येही वृक्ष कोसळला. या दोन्ही घटनांमध्ये प्राणहानी झाली नाही. देवरुखमधील वटवृक्षाखाली संतोष अनंत करंडे यांची रिक्षा (एमएच ०८ पी ७११६) चेपली गेली. भाडे आणण्यासाठी सोळजाई मंदिराच्या दिशेने जात असताना वृक्ष समोर आपल्याकडे झेपावत असल्याचे कळताच त्याने रिक्षातून उडी मारली. जवळच असणाऱ्या संतोष मांगले यांच्या दोन मोटरसायकल, रिक्षा व १२ दुकानांचे झाडामुळे नुकसान झाले आहे. फैरोज मणेर, मेहबूब पुजारी, राजू केदारी, अमित चव्हाण, ओम साई स्वीट मार्ट, दीपक देवरुखकर, बंटी चव्हाण, अभिजीत चव्हाण, बाळू ढवळे, लक्ष्मी बेकरी, साखरपेकर यांचे चप्पल मार्ट या दुकानांची वृक्ष कोसळल्याने हानी झाली आहे. लांजा : गेला महिनाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोरदार सुरुवात केल्याने शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निष्कर्ष हॉस्पिटलजवळ महामार्गावर झाड पडल्याने एकेरी वाहतूक सुरू चालू होती. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे सध्या तरी पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गावोगावी शेतकरीवर्ग शेतीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)