शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे थैमान, मोठे नुकसान

By admin | Updated: July 12, 2014 00:38 IST

रत्नागिरी शांत : संगमेश्वर, देवरूखला पावसाने झोडपले, नद्यांमध्ये पाणी

रत्नागिरी : जवळजवळ महिन्याभराची प्रतीक्षा करायला लावून सर्वांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आगमन करताना जिल्ह्याला चांगलाच दणका दिला आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. दापोलीमध्ये चार दिसांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह भोपण खाडीमध्ये सापडला आहे.या पावसाचा सर्वाधिक फटका देवरूख, संगमेश्वरला बसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूण, खेड, मंडणगडलाही दमदार पाऊस सुरू होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला मात्र पावसाने दिलासा दिला. गुरूवारी दुपारनंतर पावसाला सुरूवात झाली. थोडी-थोडी विश्रांती घेत पाऊस अजून सुरूच आहे. (प्रतिनिधी)देवरुख : आज देवरूख, संगमेश्वर परिसराला पावसाने झोडपून काढले. देवरुख बाजारपेठेतील जुनाट वटवृक्ष कोसळून त्याखाली एक रिक्षा, दोन मोटारसायकल आणि तब्बल २४ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमेश्वर रिक्षा स्टँडजवळ जुनाट वृक्ष कोसळून मुंबई - गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प होती. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या पावसाने देवरूख परिसरात ४७ लाख १९ हजार रूपयांचे नुकसान झाल्याबाबतचा पंचनामा देवरूख महसूलने केला आहे.देवरूख येथील महाकाय वटवृक्ष दूर करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. त्यात महेश जागुष्टे (ओझरे खुर्द), संतोष शिगवण (निवे बुद्रुक), सोमा जाधव (कुडवली) यांना किरकोळ दुखापत झाली. संगमेश्वरमध्येही वृक्ष कोसळला. या दोन्ही घटनांमध्ये प्राणहानी झाली नाही. देवरुखमधील वटवृक्षाखाली संतोष अनंत करंडे यांची रिक्षा (एमएच ०८ पी ७११६) चेपली गेली. भाडे आणण्यासाठी सोळजाई मंदिराच्या दिशेने जात असताना वृक्ष समोर आपल्याकडे झेपावत असल्याचे कळताच त्याने रिक्षातून उडी मारली. जवळच असणाऱ्या संतोष मांगले यांच्या दोन मोटरसायकल, रिक्षा व १२ दुकानांचे झाडामुळे नुकसान झाले आहे. फैरोज मणेर, मेहबूब पुजारी, राजू केदारी, अमित चव्हाण, ओम साई स्वीट मार्ट, दीपक देवरुखकर, बंटी चव्हाण, अभिजीत चव्हाण, बाळू ढवळे, लक्ष्मी बेकरी, साखरपेकर यांचे चप्पल मार्ट या दुकानांची वृक्ष कोसळल्याने हानी झाली आहे. लांजा : गेला महिनाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोरदार सुरुवात केल्याने शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निष्कर्ष हॉस्पिटलजवळ महामार्गावर झाड पडल्याने एकेरी वाहतूक सुरू चालू होती. संततधार कोसळणाऱ्या या पावसामुळे नदी, नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे सध्या तरी पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गावोगावी शेतकरीवर्ग शेतीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)