शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

रत्नागिरीत पावसानं घेतली उसंत; सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत घट 

By मनोज मुळ्ये | Updated: July 20, 2023 10:01 IST

पाऊस आता सरींवर असल्याने वशिष्ठी नदीची पातळी ४.२२ मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आहे.

रत्नागिरी : पावसाने थोडी उसंत घेतल्याने जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी आणि अर्जुना या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जगबुडीची पातळी कमी झाली असली तरी अजूनही पाणी धोका पातळीपेक्षा अधिक आहे. दरम्यान वाशिष्ठीच्या काल वाढलेल्या पाण्यामुळे त्यावरील पुलाच्या भरावाचा काही भाग वाहून गेला आहे.

पाऊस आता सरींवर असल्याने वशिष्ठी नदीची पातळी ४.२२ मी म्हणजेच इशारा पातळीच्या खाली आहे. शहरात सध्या कोणत्याही ठिकाणी पाणी नाही. पोफळी, कोळकेवाडी, चिपळूण या परिसरात पहाटे ५ पासून पाऊस बंद आहे. बुधवारी सकाळी चिपळूण शहरातील एका कुटुंबातील ( शिंदे) ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने सायंकाळी आणखी १६ व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी मौजे कान्हे (ता. चिपळूण) येथे घराजवळ दरड कोसळल्याने ३ कुटुंबातील १६ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. कुंभार्ली घाटात वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात दुहेरी वाहतूक सुरळीत सुरू आहे. परशुराम घाटात लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वाशिष्ठीप्रमाणे राजापुरातील अर्जुना नदीची पाणी पातळीही घटली आहे. तीही इशारा पातळीपेक्षा कमी आहे. जगबुडीची पाणी पातळीही घटली आहे. मात्र ती अजून धोका पातळीच्या वर आहे. दरम्यान, रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी पुलाच्या भरावाचा काही भाग बुधवारी रात्री वाहून गेला. त्याने वाहतुकीला काही फरक पडला नसला तरी तो लवकरात लवकर भरणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस