शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

पावसाचा जोर काही दिवसात वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाची सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळीही तो कायम होता. त्यामुळे ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाची सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जोर वाढला असून, शुक्रवारी सकाळीही तो कायम होता. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम रहाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामान खात्याकडूनही १२ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पाठ फिरवलेल्या पावसाने जिल्ह्यात गुरुवारपासून पडण्यास सुरुवात केली आहे. सुमारे पंधरा दिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बळीराजा चिंतेत होता. परंतु गुरुवारपासून पुन्हा पावसाचे ‘कम बॅक’ झाले आहे. अधूनमधून जोरदार सरी काेसळत असल्याने आता गारवाही जाणवू लागला आहे.

गुरुवारी सकाळपासूनच पावसाने चांगली गती घेतली आहे. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची जोरदार सुरुवात झाली. त्यानंतर ११ वाजल्यापासून थोडी उसंत घेतली होती. दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळीही पुन्हा वाढ झाली. दिवसभर पावसाचे वातावरण होते.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४३७.७० मिलिमीटर (सरासरी ४८.६३ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कुठेही पडझडीच्या घटनांची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही.

भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ९ ते १२ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.