शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रत्नागिरीत हवामान खाते बसविणार ‘रडार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST

रत्नागिरी : वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक ...

रत्नागिरी : वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डाॅ. मृत्यूंजय माेहापात्रा यांनी दिली.

इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटी (आयएमएस)तर्फे ‘हवामान शास्त्र आणि हवामान सेवांमधील अलीकडील प्रगती’ या विषयावर तीनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयाेजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे गुरूवारी (१७ जून) उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाेलताना डाॅ. माेहापात्रा यांनी ही माहिती दिली.

या कार्यशाळेला पुणे वेधशाळेचे डाॅ. के. एस. हाेसाळीकर आणि डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ. माेहापात्रा यांनी सांगितले की, वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यात आले आहे. जगभरातील सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती गाेळा करून त्याचे एकत्रिकरण केले जाते. त्यानंतर ती प्रसारीत केली जाते. सध्या मुंबई, वेरावल आणि गाेवा येथे रडार कार्यान्वित आहे. याच धर्तीवर रत्नागिरीतही रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे रडार सी - बॅण्डचे असणार आहे. या रडारमुळे तीन ते चार तासातील अंदाज नाेंदविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात रडार कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डाॅ. माेहापात्रा यांनी यावेळी दिली.