शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

रत्नागिरीत हवामान खाते बसविणार ‘रडार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST

रत्नागिरी : वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक ...

रत्नागिरी : वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच ‘रडार’ बसविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंघालक डाॅ. मृत्यूंजय माेहापात्रा यांनी दिली.

इंडियन मेट्राेलाॅजिकल साेसायटी (आयएमएस)तर्फे ‘हवामान शास्त्र आणि हवामान सेवांमधील अलीकडील प्रगती’ या विषयावर तीनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयाेजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे गुरूवारी (१७ जून) उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाेलताना डाॅ. माेहापात्रा यांनी ही माहिती दिली.

या कार्यशाळेला पुणे वेधशाळेचे डाॅ. के. एस. हाेसाळीकर आणि डाॅ. जे. आर. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डाॅ. माेहापात्रा यांनी सांगितले की, वादळ आणि पावसाची नाेंद करण्यासाठी विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्र विकसित करण्यात आले आहे. जगभरातील सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती गाेळा करून त्याचे एकत्रिकरण केले जाते. त्यानंतर ती प्रसारीत केली जाते. सध्या मुंबई, वेरावल आणि गाेवा येथे रडार कार्यान्वित आहे. याच धर्तीवर रत्नागिरीतही रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे रडार सी - बॅण्डचे असणार आहे. या रडारमुळे तीन ते चार तासातील अंदाज नाेंदविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात रडार कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती डाॅ. माेहापात्रा यांनी यावेळी दिली.