शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांसमाेर महामार्गावर अडचणींची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हर्षल शिराेडकर / खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हर्षल शिराेडकर / खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी वाहतुकीला धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घाटात नियंत्रित वेगाने धावणारी वाहनेही रस्त्यालगत कठड्याला धडकत व उलटत असल्याने हा मार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील अपघातस्थळांचा आढावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेण्याची गरज आहे. मार्ग सुरक्षित व वाहतुकीस योग्य ठेवण्याच्या सूचना करण्याची मागणी हाेत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे या ठिकाणांहून नागरिक कोकणातील आपल्या मूळगावी येतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी व नंतर चार ते पाच दिवस खासगी वाहनांची संख्या वाढलेली असते. मुंबई व पुणे या महानगरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील अनेक कुटुंबे नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाली आहेत. सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कशेडी, परशुराम व भोस्ते या तीन घाटांमध्ये वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

खेडमधील भोस्ते घाट गेल्या काही दिवसांमध्ये लहान मोठ्या अपघातामुळे सतत चर्चेत राहिला आहे. महामार्गावरील या घाटात सुमारे ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा संबंधित कंपनीने केला असला तरी पावसाळ्याच्या कालावधीत अनेकदा रस्त्यावर दरडी कोसळल्याने चार पदरी रस्त्यांपैकी दोन पदरी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याची नामुष्की या ठेकेदारावर ओढवली होती. घाटातील अनेक वळणे पूर्वीच्या रस्त्यापेक्षाही धोकादायक बनली असून, नियंत्रित वेगात वाहने चालवणाऱ्या चालकांचेही वाहनांवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगत उलटत आहेत. भोस्ते घाटातील सर्वात मोठे व अवघड वळण असलेल्या रस्त्याच्या लगत सुरक्षेसाठी दरीच्या बाजुला उंच कठडा उभारला आहे. मात्र, या कठड्यावरच अनेक अवजड वाहने धडकत असून, त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहत या ठिकाणी महामार्गाच्या ठेकेदाराने गतिरोधक उभारले असून, लहान मोठी वाहने या गतिरोधकावरून धावताना आपटत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यात सुरू असलेली अपघातांची मालिका थांबतच नसल्यामुळे आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना आपली वाहने विनाअपघात व सुरक्षितपणे आपल्या गावी नेण्यासाठी नक्कीच अडचणींची शर्यत पार करावी लागेल.