शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

गणेशाेत्सवासाठी येणाऱ्यांसमाेर महामार्गावर अडचणींची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हर्षल शिराेडकर / खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हर्षल शिराेडकर / खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात भोस्ते घाटात अनेक ठिकाणी वाहतुकीला धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घाटात नियंत्रित वेगाने धावणारी वाहनेही रस्त्यालगत कठड्याला धडकत व उलटत असल्याने हा मार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गावरील अपघातस्थळांचा आढावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेण्याची गरज आहे. मार्ग सुरक्षित व वाहतुकीस योग्य ठेवण्याच्या सूचना करण्याची मागणी हाेत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे या ठिकाणांहून नागरिक कोकणातील आपल्या मूळगावी येतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी व नंतर चार ते पाच दिवस खासगी वाहनांची संख्या वाढलेली असते. मुंबई व पुणे या महानगरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील अनेक कुटुंबे नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाली आहेत. सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कशेडी, परशुराम व भोस्ते या तीन घाटांमध्ये वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

खेडमधील भोस्ते घाट गेल्या काही दिवसांमध्ये लहान मोठ्या अपघातामुळे सतत चर्चेत राहिला आहे. महामार्गावरील या घाटात सुमारे ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा संबंधित कंपनीने केला असला तरी पावसाळ्याच्या कालावधीत अनेकदा रस्त्यावर दरडी कोसळल्याने चार पदरी रस्त्यांपैकी दोन पदरी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याची नामुष्की या ठेकेदारावर ओढवली होती. घाटातील अनेक वळणे पूर्वीच्या रस्त्यापेक्षाही धोकादायक बनली असून, नियंत्रित वेगात वाहने चालवणाऱ्या चालकांचेही वाहनांवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगत उलटत आहेत. भोस्ते घाटातील सर्वात मोठे व अवघड वळण असलेल्या रस्त्याच्या लगत सुरक्षेसाठी दरीच्या बाजुला उंच कठडा उभारला आहे. मात्र, या कठड्यावरच अनेक अवजड वाहने धडकत असून, त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहत या ठिकाणी महामार्गाच्या ठेकेदाराने गतिरोधक उभारले असून, लहान मोठी वाहने या गतिरोधकावरून धावताना आपटत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. गेल्या चार महिन्यात सुरू असलेली अपघातांची मालिका थांबतच नसल्यामुळे आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना आपली वाहने विनाअपघात व सुरक्षितपणे आपल्या गावी नेण्यासाठी नक्कीच अडचणींची शर्यत पार करावी लागेल.