शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र माने स्वगृही परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:53 IST

पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देपक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी कोकणचे नेते नारायण राणे यांना धक्का देण्याचे राजकारणउद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत हुकलेला मुहूर्त आज साधला गेला

रत्नागिरी,9  : पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

१९९0 साली संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने प्रथम आमदार झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यावेळी देवरूखला जंगी सभा झाली होती. त्यानंतर १९९५ साली ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री म्हणून रवींद्र माने यांची निवड झाली.

रत्नागिरीचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले. जोवर मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर होते, तोपर्यंत माने पालकमंत्री होते. व्यासप्रकरणी मनोहर जोशी यांच्याबरोबरच माने यांनाही पद सोडावे लागले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष बने यांनी बंडखोरी केलेली असतानाही रवींद्र माने तिसºयांदा विजयी झाले.

२00४ मध्ये मात्र संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने यांच्याजागी सुभाष बने यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून माने नाराज होते. २0१0 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीत गेल्यानंतर माने यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. गेले वर्षभर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ते एकदा मातोश्रीवर जाऊन पोहोचलेही होते. मात्र त्यावेळी प्रवेश झाला नाही. त्यावेळी हुकलेला मुहूर्त आज साधला गेला. दुपारी शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.शिवसेनेचा हेतू काय?पक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना परत पक्षात घेण्यामागे शिवसेनेचा काय हेतू आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर शिवसेनेला धक्का देण्याचा मुद्दा उघडपणे मांडला आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्ष मजबूत करण्यासाठी जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.