शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र माने स्वगृही परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:53 IST

पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देपक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी कोकणचे नेते नारायण राणे यांना धक्का देण्याचे राजकारणउद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत हुकलेला मुहूर्त आज साधला गेला

रत्नागिरी,9  : पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

१९९0 साली संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने प्रथम आमदार झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यावेळी देवरूखला जंगी सभा झाली होती. त्यानंतर १९९५ साली ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री म्हणून रवींद्र माने यांची निवड झाली.

रत्नागिरीचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले. जोवर मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर होते, तोपर्यंत माने पालकमंत्री होते. व्यासप्रकरणी मनोहर जोशी यांच्याबरोबरच माने यांनाही पद सोडावे लागले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष बने यांनी बंडखोरी केलेली असतानाही रवींद्र माने तिसºयांदा विजयी झाले.

२00४ मध्ये मात्र संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने यांच्याजागी सुभाष बने यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून माने नाराज होते. २0१0 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीत गेल्यानंतर माने यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. गेले वर्षभर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ते एकदा मातोश्रीवर जाऊन पोहोचलेही होते. मात्र त्यावेळी प्रवेश झाला नाही. त्यावेळी हुकलेला मुहूर्त आज साधला गेला. दुपारी शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.शिवसेनेचा हेतू काय?पक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना परत पक्षात घेण्यामागे शिवसेनेचा काय हेतू आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर शिवसेनेला धक्का देण्याचा मुद्दा उघडपणे मांडला आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्ष मजबूत करण्यासाठी जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.