शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणकरांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

खरे तर त्या तरुणीच्या ठिकाणी अन्य कोणीही असते, तरीही हे घडलेच असते. तेव्हा या भीषण घटनेची दखल चिपळूणकरांना घ्यावीच ...

खरे तर त्या तरुणीच्या ठिकाणी अन्य कोणीही असते, तरीही हे घडलेच असते. तेव्हा या भीषण घटनेची दखल चिपळूणकरांना घ्यावीच लागणार आहे. आज एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी या घटनेत नाहक भरडली गेली. उद्या आणखी कोणावरही वेळ येऊ शकते. म्हणून प्रत्येकाने जागे राहिले पाहिजे. या घटनेनंतर शिक्षण, नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या मुली व त्यांचे पालक धास्तावले आहेत. शिवाय घराबाहेर पडणाऱ्या महिलाही असुरक्षिततेच्या दडपणाखाली वावरत आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुली नोकरी, शिक्षणानिमित्ताने शहरात येतात. सायंकाळी उशिरा घराकडे निघतात. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. तेव्हा या प्रसंगातून सावरण्यासाठी चिपळूणकर म्हणून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. सर्वप्रथम संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. दहा वर्षे ही मागणी केली जात आहे. परंतु, त्या मागणीवर नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जराही गांभीर्याने विचार केलेला नाही. नगर परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीतील जाहीरनाम्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा मांडला जातो. मात्र, निवडणूक संपली की, त्या कॅमेऱ्याचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा जणू विसर पडतो. त्याची आठवण आता नागरिकांनीच करून द्यायला हवी. म्हणून म्हणतो प्रत्येकाने पुढे यायला हवे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी हा दुर्दैवी प्रसंग घडला, त्याठिकाणी कायम अंधार असतो. भोगाळे हा परिसर बाजारपेठेतील असला, तरी तेथे पथदीप मोजकेच आहेत. त्या अंधाराचाच फायदा नराधमाने उचलला. अशाच पद्धतीचा अंधार चिपळूण शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यावर कायम असतो. गुहागर बायपास रस्ता, गोवळकोट रोड, पेठमाप, शंकरवाडी, मुरादपूर रस्ता या भागात कायम अंधार असतो. अशा ठिकाणचा अंधार वेळीच दूर करायला हवा. शिवाय पोलिसांची गस्त केवळ रात्रीची नव्हे, तर आता सायंकाळच्या वेळीही ठेवायला हवी. तरच अशा प्रवृत्तीला आळा बसेल. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.

- संदीप बांद्रे