शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिपळूणकरांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

खरे तर त्या तरुणीच्या ठिकाणी अन्य कोणीही असते, तरीही हे घडलेच असते. तेव्हा या भीषण घटनेची दखल चिपळूणकरांना घ्यावीच ...

खरे तर त्या तरुणीच्या ठिकाणी अन्य कोणीही असते, तरीही हे घडलेच असते. तेव्हा या भीषण घटनेची दखल चिपळूणकरांना घ्यावीच लागणार आहे. आज एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी या घटनेत नाहक भरडली गेली. उद्या आणखी कोणावरही वेळ येऊ शकते. म्हणून प्रत्येकाने जागे राहिले पाहिजे. या घटनेनंतर शिक्षण, नोकरी निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या मुली व त्यांचे पालक धास्तावले आहेत. शिवाय घराबाहेर पडणाऱ्या महिलाही असुरक्षिततेच्या दडपणाखाली वावरत आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुली नोकरी, शिक्षणानिमित्ताने शहरात येतात. सायंकाळी उशिरा घराकडे निघतात. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे. तेव्हा या प्रसंगातून सावरण्यासाठी चिपळूणकर म्हणून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. सर्वप्रथम संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. दहा वर्षे ही मागणी केली जात आहे. परंतु, त्या मागणीवर नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जराही गांभीर्याने विचार केलेला नाही. नगर परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीतील जाहीरनाम्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा मांडला जातो. मात्र, निवडणूक संपली की, त्या कॅमेऱ्याचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा जणू विसर पडतो. त्याची आठवण आता नागरिकांनीच करून द्यायला हवी. म्हणून म्हणतो प्रत्येकाने पुढे यायला हवे. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी हा दुर्दैवी प्रसंग घडला, त्याठिकाणी कायम अंधार असतो. भोगाळे हा परिसर बाजारपेठेतील असला, तरी तेथे पथदीप मोजकेच आहेत. त्या अंधाराचाच फायदा नराधमाने उचलला. अशाच पद्धतीचा अंधार चिपळूण शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यावर कायम असतो. गुहागर बायपास रस्ता, गोवळकोट रोड, पेठमाप, शंकरवाडी, मुरादपूर रस्ता या भागात कायम अंधार असतो. अशा ठिकाणचा अंधार वेळीच दूर करायला हवा. शिवाय पोलिसांची गस्त केवळ रात्रीची नव्हे, तर आता सायंकाळच्या वेळीही ठेवायला हवी. तरच अशा प्रवृत्तीला आळा बसेल. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.

- संदीप बांद्रे