शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नुकसानाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

दापोली : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. या चक्रीवादळाने तालुक्यातील मुरुड, हर्णै, ...

दापोली : तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. या चक्रीवादळाने तालुक्यातील मुरुड, हर्णै, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, वेळास, बाणकोट, देव्हारे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मच्छीमारांचे नुकसान

राजापूर : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यातील साखरी नाटे, आंबोळगड येथील सात मच्छीमारांचे २ लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात आंबोळगड येथील ४ मच्छीमारांचे तर साखरी नाटे येथील ३ मच्छीमारांचे अंशत: व जाळ्यांचे नुकसान झाले आहे.

विद्युत खांबांची दुरवस्था

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते ग्रामपंचायत क्षेत्राच्या बहुतांशी प्रभागातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबांची दुरवस्था झाली आहे. सध्या मान्सूनपूर्व कामाला सुरुवात झाली असून विद्युत तारांभोवतीची धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर धोकादायक खांबही बदलावेत, अशी मागणी होत आहे.

विहीर ढासळली

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथे तौक्ते चक्रीवादळाने सार्वजनिक विहिरीचे मोठे नुकसान केले असून ही विहीर पूर्णपणे ढासळली आहे. या विहिरीमुळे गावातील ब्राह्मणवाडी आणि शिंदेवाडी येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत होता. परंतु वादळी पावसाने ही विहीर ढासळली आहे.

चार दिवसानंतर वीजपुरवठा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावालाही चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास वादळ सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या होत्या. अखेर ५४ तासानंतर या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

भरपाईची मागणी

गुहागर : चक्रीवादळाने तालुक्यात अनेक घरांचे अंशत: नुकसान केले आहे. गोठे तसेच सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. अनेक झाडांचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करून योग्य भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

उकाडा वाढला

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. मात्र गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली आणि सकाळपासूनच कडाक्याचे ऊन पडायला सुरुवात झाली. त्यामुळे दिवसभर पुन्हा कमालीचा उकाडा होऊ लागला. सध्या उष्णता अधिक वाढू लागली आहे.

खरेदीची लगबग

रत्नागिरी : कृषीविषयक सेवांची दुकाने आता अधिक काळ सुरू रहाणार आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू असल्याने दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शहराच्या ठिकाणी येऊन खरेदी करणे त्रासदायक होत होते. मात्र आता दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामसेवकांमध्ये समाधान

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून देऊन १,५०० रुपये करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये समाधान पसरले आहे.

कोरोना साथ आटोक्यात

मंडणगड : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता अतिशय कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या शून्य झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही शून्यावर आला आहे. ही साथ आता आटोक्यात येऊ लागल्याने तालुक्यामधून दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.