शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी यंत्रणा सज्ज ,, संस्थांकडून २४४ व्हीलचेअर्स उपलब्ध -- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:52 IST

जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर  केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी प्रचारात - कार्यालयात शुकशुकाट  - कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर  केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. याअंतर्गत ज्या केंद्र्रांवर दिव्यांग मतदार आहेत. या अंतर्गत, ज्या केद्र्रांवर दिव्यांग मतदार आहेत, अशा केंद्रांची स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली होती. दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना यावेळी PWD अ‍ॅपद्वारे नोंदणी करुन मतदानासाठी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

या सर्व दिव्यांग मतदारांप्रमाणेच ज्येष्ठ मतदारांना रांगेशिवाय थेट मतदान करता येणार आहे. ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर आणणे व परत घरी सोडणे, यासाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आली आहेत. दिव्यांगांना केंद्रात जाणे शक्य व्हावे, यासाठी उद्योजकांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी २०० व्हीलचेअर प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांचे विशेष आभार मानले आहेत. 

या २०० व्हीलचेअर्स सोबत रत्नागिरी नगर परिषदेने ४४ व्हीलचेअर्स खरेदी केल्या. त्यामुळे एकूण २४४ व्हीलचेअर्स प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या २० तीनचाकी सायकली यासाठी वापरल्या जाणार आहेत. या साधनांमुळे जिल्ह्यातील ७५८ मतदान केंद्र्रांवर असणाऱ्या ४३९६ दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ होईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

 

जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी प्रचारात - कार्यालयात शुकशुकाट  - कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न

रत्नागिरी : लोकसभा निवडणूक असल्याने जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी व सदस्य प्रचारात गुंतले आहेत. त्याचबरोबर अधिकारीही निवडणुकीच्या कामात गुंतले असून, परिषद भवनात शुकशुकाट असतो. जिल्हा परिषदेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. विरोधी पक्ष असला तरी पुरेसे सत्ताबळ सेनेकडे असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेची पाळेमुळे अगदी खोलवर रुतलेली आहेत. तरीही शिवसेनेकडून या निवडणुकीमध्येही जोर लावण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांवर या निवडणुकी निमित्ताने  जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये बैठका, सभा घेण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मते मिळावीत तसेच यावेळीही पक्षाला मतदान वाढावे, त्यादृष्टीने शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांनी व सदस्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी, सदस्य आपला गट कार्यकर्त्यांना घेऊन पिंजून काढत आहेत. त्यामुळे परिषद भवनाकडे पदाधिकारी, सदस्यांनी पाठ फिरवली असून, संपूर्ण लक्ष निवडणुकीवर ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचाºयांना घेण्यात आलेले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी निवडणूक विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असतात. तसेच निवडणुकी निमित्ताने कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षणेही देण्यात येत आहेत. 

त्यामुळे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने ते कार्यालयात कमीच असतात. पदाधिकारी, अधिकारी निवडणुकीमध्ये गुंतल्याने गेले कित्येक दिवस परिषद भवनामध्ये शुकशुकाट असतो. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही प्रचारात गुंतल्याने त्यांचीही परिषद भवनातील रेलचेल कमी असते. त्यामुळे नेहमीच गजबजलेले जिल्हा परिषद सध्या सुनेसुने दिसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक