शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिव्यांगांसाठी यंत्रणा सज्ज ,, संस्थांकडून २४४ व्हीलचेअर्स उपलब्ध -- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:52 IST

जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर  केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी प्रचारात - कार्यालयात शुकशुकाट  - कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४३९६ दिव्यांग व्यक्तिंना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी निवडणूक विभाग सज्ज असून, या कामासाठी २४४ व्हीलचेअर्स आणि २० तीनचाकी सायकलचा वापर  केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. याअंतर्गत ज्या केंद्र्रांवर दिव्यांग मतदार आहेत. या अंतर्गत, ज्या केद्र्रांवर दिव्यांग मतदार आहेत, अशा केंद्रांची स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी केली होती. दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना यावेळी PWD अ‍ॅपद्वारे नोंदणी करुन मतदानासाठी जाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

या सर्व दिव्यांग मतदारांप्रमाणेच ज्येष्ठ मतदारांना रांगेशिवाय थेट मतदान करता येणार आहे. ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर आणणे व परत घरी सोडणे, यासाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आली आहेत. दिव्यांगांना केंद्रात जाणे शक्य व्हावे, यासाठी उद्योजकांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी २०० व्हीलचेअर प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांचे विशेष आभार मानले आहेत. 

या २०० व्हीलचेअर्स सोबत रत्नागिरी नगर परिषदेने ४४ व्हीलचेअर्स खरेदी केल्या. त्यामुळे एकूण २४४ व्हीलचेअर्स प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या २० तीनचाकी सायकली यासाठी वापरल्या जाणार आहेत. या साधनांमुळे जिल्ह्यातील ७५८ मतदान केंद्र्रांवर असणाऱ्या ४३९६ दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ होईल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

 

जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी प्रचारात - कार्यालयात शुकशुकाट  - कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न

रत्नागिरी : लोकसभा निवडणूक असल्याने जिल्हा परिषदेचे सर्वच पदाधिकारी व सदस्य प्रचारात गुंतले आहेत. त्याचबरोबर अधिकारीही निवडणुकीच्या कामात गुंतले असून, परिषद भवनात शुकशुकाट असतो. जिल्हा परिषदेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. विरोधी पक्ष असला तरी पुरेसे सत्ताबळ सेनेकडे असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेची पाळेमुळे अगदी खोलवर रुतलेली आहेत. तरीही शिवसेनेकडून या निवडणुकीमध्येही जोर लावण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांवर या निवडणुकी निमित्ताने  जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये बैठका, सभा घेण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मते मिळावीत तसेच यावेळीही पक्षाला मतदान वाढावे, त्यादृष्टीने शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाºयांनी व सदस्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला आहे. प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी, सदस्य आपला गट कार्यकर्त्यांना घेऊन पिंजून काढत आहेत. त्यामुळे परिषद भवनाकडे पदाधिकारी, सदस्यांनी पाठ फिरवली असून, संपूर्ण लक्ष निवडणुकीवर ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचाºयांना घेण्यात आलेले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी निवडणूक विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असतात. तसेच निवडणुकी निमित्ताने कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षणेही देण्यात येत आहेत. 

त्यामुळे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने ते कार्यालयात कमीच असतात. पदाधिकारी, अधिकारी निवडणुकीमध्ये गुंतल्याने गेले कित्येक दिवस परिषद भवनामध्ये शुकशुकाट असतो. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही प्रचारात गुंतल्याने त्यांचीही परिषद भवनातील रेलचेल कमी असते. त्यामुळे नेहमीच गजबजलेले जिल्हा परिषद सध्या सुनेसुने दिसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक