शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

परशुराम घाटातील नैसर्गिक जलस्रोतला दिले संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहून जाणाऱ्या नैसर्गिक जलस्रोताला ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आले आहे. वाया जाणारे ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहून जाणाऱ्या नैसर्गिक जलस्रोताला ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून संरक्षण देण्यात आले आहे. वाया जाणारे पाणी साठवता येईल व डोंगर उतारावरील वृक्ष लागवडीसाठी उपयोगी पडेल, अशी व्यवस्था येथे उभारण्यात आली आहे. याच पद्धतीने चौपदरीकरणाच्या कामात ज्या-ज्या ठिकाणी नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध होतील, तेथे संरक्षण देण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.

गेले अनेक दिवस येथील निसर्गप्रेमी परशुराम घाटातील नैसर्गिक जलस्रोतविषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करीत होते. मात्र, परशुराम येथील काम जागेच्या मोबदल्यामुळे वादग्रस्त बनले आहे, शिवाय महाड ठेकेदाराच्या हद्दीत हे काम येते. त्यामुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी या प्रश्नी सुवर्णमध्य काढला. अधिकारी पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली व अखेर नायब तहसीलदार तानाजी शेलार व कार्यालयीन अधिकारी प्रसन्ना पेठे यांनी ठेकेदार कंपनी कल्याण टोलवेजचे व्यवस्थापक श्रीकांत बाखळे यांच्या सहकार्याने व त्यांचे पर्यवेक्षक महेश नलावडे यांच्या मदतीने हे काम पूर्णत्वास नेले.

परशुराम घाटातील वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग व सिंचनाकरिता येथे जेसीबीद्वारे अनेक झऱ्याचे पाणी एकत्र करून खड्डा मारण्यात आला आहे. उर्वरित वाहून जाणारे पाणी येथे असणाऱ्या नाल्याद्वारे ग्रॅव्हिटीने वाड्यांना व झाडांना सोडण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमानही वाढत आहे. प्रत्येक ठिकाणची भूजल पातळी खालावत आहे. याचा प्रत्येकाने विचार करून जेथे जेथे शक्य आहे, तेथे नैसर्गिक जलस्रोताद्वारे जलसिंचन केले पाहिजे, असे आवाहन जलदूत शाहनवाज शाह यांनी केले आहे.