शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

प्रकल्पग्रस्तांची अभियंत्यांनी घेतली भेट

By admin | Updated: February 2, 2016 23:42 IST

गडनदी प्रकल्प : विविध मागण्यांसाठी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुच

चिपळूण : गडनदी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध २० मागण्यांसाठी चिपळूण लघुपाटबंधारे खात्यासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले होते. मंगळवारी सायंकाळी उशिरा अधीक्षक अभियंता अ. का. काळोखे यांनी उपोषणकर्त्यांची चिपळूण येथे भेट घेतली. मौजे राजीवली, कुटगिरी, रातांबी धरणग्रस्त ग्रामस्थ समितीतर्फे सोमवारपासून लघुपाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या रस्ता, अपुऱ्या सुविधा, शिल्लक कामे, भूखंडाचे सातबारा अदा करण्याबाबतची कामे, नवीन पाईपलाईन, गंजलेले विजेचे पोल, निकृष्ठ शौचालय, स्मशानभूमी व शाळा यासह आश्वासन दिलेली अन्य कामांची पूर्तता करण्यात आलेली नाही. ही पूर्तता तातडीने करावी, या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. कार्यकारी अभियंता अनिल भालेराव यांनी उपोषणकर्त्यांना समजावून सांगितले. परंतु, उपोषकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रकल्पग्रस्तांनी सूचविलेल्या कामांसाठी किमान ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी लागणार आहे. शासन स्तरावर एवढा निधी उपलब्ध झाल्यानंतर ही सर्व कामे मार्गी लागतील, असे समजते. दरम्यान, सायंकाळी अधीक्षक अभियंता काळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली होती. रात्री उशिरापर्यंत उपोषणकर्त्यांचे नेते सूर्यकांत साळुंखे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांशी ही चर्चा सुरु होती. मात्र तोडगा निघाला नव्हता. (प्रतिनिधी) ४विविध २० मागण्या प्रलंबित. ४प्रकल्पग्रस्तांच्या कामांसाठी ३२ कोटींपेक्षा जास्त निधी लागणार. ४अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू. ४रात्री उशिरापर्यंत तोडगा काढण्यात अपयश.