शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

जन आशीर्वाद यात्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात मनाई आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी ...

रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा चालू आहे. यात्रेदरम्यान तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे तसेच ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असे उत्सव साजरे होणार आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये शारीरिक दुखापत करणारी हत्यारे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू, दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, प्रक्षोभक भाषणे करणे, शव किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

हे आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी या आदेशात नमूद केले आहे.