शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

संचमान्यतेच्या आदेशाचा निषेध

By admin | Updated: August 31, 2015 21:20 IST

भारत घुले : माध्यमिक शाळा नामशेष करणारा आदेश

टेंभ्ये : राज्य शासनाने २८ रोजी जाहीर केलेल्या संचमान्यता आदेशाला संघटनास्तरावरुन मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. माध्यमिक अध्यापक संघाने या धोरणाचा निषेध केला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील माध्यमिक शाळा नामशेष करणारा हा आदेश आहे. यामुळे शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणार असल्याचे मत अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केले.विविध शिक्षण संघटनांमध्ये सध्या संचमान्यतेचा विषय गाजत आहे. शासनाच्या या धोरणामुळे अनेक माध्यमिक शाळा अडचणीत येण्याची शक्यता असून काही शाळांचे मुख्याध्यापक पदही धोक्यात येणार असल्याने संघटनांनी याविरोधात आवाज उठवला आहे. संच मान्यतेसंदर्भातील निकष निश्चित करणाऱ्या शासन आदेशामध्ये अनेक नवीन धोरणे राबवण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. तुकडी पद्धत बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. माध्यमिक शाळांमध्ये मंजूर होणाऱ्या मूलभूत तीन शिक्षकांमध्ये भाषा विषयासाठी एक, गणित विज्ञानसाठी एक व समाजशास्त्रासाठी एक असे तीनच शिक्षक गृहीत धरण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित विषयांच्या शिक्षकांबाबत शासनाची भूमिका अत्यंत निष्ठूर आहे. विद्यार्थीसंख्येच्या निकषावर मुख्याध्यापकपद निश्चित करण्याच्या निर्णयामुळे अनेक शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर होणार नाही. त्यामुळे माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांशिवाय चालवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अध्यापक संघाने या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. शासनाने हा निर्णय रद्द करुन प्रचलित नियमाप्रमाणे संचमान्यता करावी, अशी मागणी संघटना स्तरावरुन करण्यात आली आहे. शासनाने या मागणीचा विचार न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा अध्यापक संघाने दिला आहे. (वार्ताहर)४० टक्के शाळा मुख्याध्यापकांविना?संचमान्यतेचा आदेश तंतोतंत लागू केल्यास जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाचवी ते दहावीचे तीन वर्ग असणाऱ्या अनेक शाळांची विद्यार्थीसंख्या ९० पेक्षा कमी आहे. यामुळे संबंधित मुख्याध्यापकांची वेतनश्रेणी अबाधित ठेऊन सहाय्यक शिक्षकांचे काम करावे लागणार आहे.संच मान्यतेसंदर्भातील शासनाने नुकताच जाहीर केलेला आदेश पूर्णत: अयोग्य आहे. मुख्याध्यापकांशिवाय शाळा चालवण्याच्या शासनाच्या आश्चर्यकारक निर्णयाचा मुख्याध्यापक संघ जाहीर निषेध करत आहे. विद्यार्थीसंख्येवर मुख्याध्यापक पदाची निर्मिती ही पूर्णत: चुकीची प्रक्रिया आहे.- विजय पाटील, सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ