शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यतेच्या आदेशाचा निषेध

By admin | Updated: August 31, 2015 21:20 IST

भारत घुले : माध्यमिक शाळा नामशेष करणारा आदेश

टेंभ्ये : राज्य शासनाने २८ रोजी जाहीर केलेल्या संचमान्यता आदेशाला संघटनास्तरावरुन मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. माध्यमिक अध्यापक संघाने या धोरणाचा निषेध केला असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील माध्यमिक शाळा नामशेष करणारा हा आदेश आहे. यामुळे शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होणार असल्याचे मत अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केले.विविध शिक्षण संघटनांमध्ये सध्या संचमान्यतेचा विषय गाजत आहे. शासनाच्या या धोरणामुळे अनेक माध्यमिक शाळा अडचणीत येण्याची शक्यता असून काही शाळांचे मुख्याध्यापक पदही धोक्यात येणार असल्याने संघटनांनी याविरोधात आवाज उठवला आहे. संच मान्यतेसंदर्भातील निकष निश्चित करणाऱ्या शासन आदेशामध्ये अनेक नवीन धोरणे राबवण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. तुकडी पद्धत बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. माध्यमिक शाळांमध्ये मंजूर होणाऱ्या मूलभूत तीन शिक्षकांमध्ये भाषा विषयासाठी एक, गणित विज्ञानसाठी एक व समाजशास्त्रासाठी एक असे तीनच शिक्षक गृहीत धरण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित विषयांच्या शिक्षकांबाबत शासनाची भूमिका अत्यंत निष्ठूर आहे. विद्यार्थीसंख्येच्या निकषावर मुख्याध्यापकपद निश्चित करण्याच्या निर्णयामुळे अनेक शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर होणार नाही. त्यामुळे माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांशिवाय चालवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अध्यापक संघाने या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. शासनाने हा निर्णय रद्द करुन प्रचलित नियमाप्रमाणे संचमान्यता करावी, अशी मागणी संघटना स्तरावरुन करण्यात आली आहे. शासनाने या मागणीचा विचार न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा अध्यापक संघाने दिला आहे. (वार्ताहर)४० टक्के शाळा मुख्याध्यापकांविना?संचमान्यतेचा आदेश तंतोतंत लागू केल्यास जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाचवी ते दहावीचे तीन वर्ग असणाऱ्या अनेक शाळांची विद्यार्थीसंख्या ९० पेक्षा कमी आहे. यामुळे संबंधित मुख्याध्यापकांची वेतनश्रेणी अबाधित ठेऊन सहाय्यक शिक्षकांचे काम करावे लागणार आहे.संच मान्यतेसंदर्भातील शासनाने नुकताच जाहीर केलेला आदेश पूर्णत: अयोग्य आहे. मुख्याध्यापकांशिवाय शाळा चालवण्याच्या शासनाच्या आश्चर्यकारक निर्णयाचा मुख्याध्यापक संघ जाहीर निषेध करत आहे. विद्यार्थीसंख्येवर मुख्याध्यापक पदाची निर्मिती ही पूर्णत: चुकीची प्रक्रिया आहे.- विजय पाटील, सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ