शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यफूल, गहू, कोथिंबीरीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील जितेंद्र जोशी बारमाही शेती करीत असून, शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील जितेंद्र जोशी बारमाही शेती करीत असून, शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत आहेत. कोकणच्या लाल मातीत गहू, सूर्यफुलाचे उत्पादन चांगले होते, हे त्यांनी सिध्द केले आहे. गेली दोन वर्षे कोथिंबीर पिकातून उत्पन्न मिळवित आहेत.

पावसाळ्यात २२ गुंठे क्षेत्रावर ते भाताचे उत्पादन घेत असून, भात काढल्यानंतर जमिनीची वर्गवारी करून कुळीथ, पावटा, मूग, मटकी लागवड करतात. याशिवाय त्यांनी ८० नारळ, ४०० सुपारी, ६० आंबा व ४० काजू लागवड करून बागायती उत्पन्न घेत आहेत. दरवर्षी दोन क्विंटल सुपारीचे उत्पन्न प्राप्त होत आहे. वर्षाला एक हजार नारळ आणि साधारणत: २५० ते ३०० किलो काजूबी मिळवित आहेत. आंबा मात्र ते मुंबई येथे विक्रीसाठी पाठवतात, शिवाय खासगी विक्रीतूनही उत्पन्न मिळवित आहेत.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांच्याकडे सहा जनावरे आहेत. नांगरणीसाठी एक बैल जोडी असून, चार गायी व म्हशींचा सांभाळ केला आहे. दूध - दुभते प्राप्त होत असून, शेण व गोमूत्राचा वापर करून कंपोस्ट खत व जीवामृत तयार करून शेतीसाठी त्याचा वापर करीत आहेत. दुभत्या गुरांसाठी बारमाही ओला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी एक गुंठ्यावर ते मका लागवड करतात.

उन्हाळी शेतीमध्ये त्यांनी यावर्षी दोन गुंठे क्षेत्रावर गहू लागवड केली होती. शेणखत व युरिया खताचा वापर केला होता. कोकणच्या लाल मातीत गहू चांगला होतो, ते त्यांनी सिध्द केले. याशिवाय एक गुंठे क्षेत्रात त्यांनी सूर्यफूल लागवड केली होती. एका गुंठ्यात त्यांना ७५ किलो बी प्राप्त झाले असून, त्यापासून त्यांनी घाण्यावरून तेल काढून घेतले. २२ लीटर तेल त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे यावर्षी त्यांनी सूर्यफुलाची लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय गेली दोन वर्षे कोथिंबीर लागवड करीत आहेत. गुंठ्याला दहा हजारप्रमाणे उत्पन्न प्राप्त होत आहे. चांगल्या उत्पन्नामुळे उन्हाळ्यात त्यांनी दोन गुंठ्यावर लागवड वाढविल्याने त्यांना भरघोस उत्पन्न प्राप्त झाले.

बारमाही शेती

पाण्याची उपलब्धता असेल तर कोकणातही बारमाही शेती करता येते. मात्र, त्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. सुपारी, नारळ, आंबा, काजू बागायतीतून उत्तम दर्जाचे पीक मिळविण्यासाठी खताची मात्रा, कीटकनाशक फवारणी याचे नियोजन आवश्यक आहे. कोथिंबीर, सूर्यफूल ही नगदी पिके असून, उत्पन्न मिळवून देणारी आहेत. सूर्यफुलाचे पीक चांगल्या दर्जाचे घेता येते, हे जितेंद्र जोशी यांनी सिध्द केले आहे. कोथिंबीरीला चांगली मागणी असल्याने उन्हाळ्यात खप होतो. गुंठ्याला दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, हे जोशी यांनी सिध्द केले असून, भविष्यात लागवड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाचे ते वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहेत.