शहरं
Join us  
Trending Stories
1
Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
2
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार
3
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
4
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
5
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
6
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
7
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
8
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
9
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
10
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
11
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
12
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
13
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
14
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
15
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
16
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
17
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
18
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
20
Nashik: शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफळला, उमेदवाराचा पत्नीसह आत्महत्येचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचा प्रश्न न सुटलेला जवान रजा न वाढवता निघाला काश्मीरकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:55 IST

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आपल्या जागेत ग्रामपंचायतीने केलेले रस्त्याचे अतिक्रमण बाजूला करण्यासाठी सुट्टीवर आलेले सुभेदार विनोद कदम जागेचा प्रश्न अजूनही न सुटल्याने आपली रजा वाढवणार होते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी रजा वाढवण्याचा मुद्दा बाजूला ठेवला आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणाचा प्रश्न न सुटलेला जवान रजा न वाढवता निघाला काश्मीरकडेमाझ्या जागेच्या सीमेपेक्षा देशाच्या सीमेवरील समस्या मोठी

मनोज मुळ््ये रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आपल्या जागेत ग्रामपंचायतीने केलेले रस्त्याचे अतिक्रमण बाजूला करण्यासाठी सुट्टीवर आलेले सुभेदार विनोद कदम जागेचा प्रश्न अजूनही न सुटल्याने आपली रजा वाढवणार होते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी रजा वाढवण्याचा मुद्दा बाजूला ठेवला आहे.

माझ्या जागेच्या समस्येपेक्षा देशासमोरील समस्या मोठी आहे आणि मला तेथे जाणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी काश्मीरकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या जम्मू-काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या सुभेदार विनोद कदम यांची चिपळूण कळंबस्ते येथे सहा गुंठे जागा आहे. त्यांच्या घराशेजारी माजी सैनिक शांताराम शिंदे यांचे घर आहे. शिंदे यांच्या घरापर्यंत एका बाजूने डांबरी रस्ता उपलब्ध आहे. मात्र, गावातील राजकारणातून तो सध्या बंद आहे. आपल्याला रस्ता मिळावा, या मागणीसाठी शिंदे यांनी २६ जानेवारीला उपोषणाची नोटीस दिली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने घाईघाईने शिंदे यांना विनोद कदम यांच्या जागेतून रस्ता दिला. त्यासाठी विनोद कदम यांची संमती घेतली गेली नाही.

हा प्रकार कळल्यानंतर विनोद कदम ३ फेब्रुवारीला काश्मीरमधून रत्नागिरीत दाखल झाले. ४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आपली तक्रार मांडली. जिल्हाधिकारी यांनी चिपळूण उपविभागीय अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याचे आदेश दिले. मात्र, दि. ५ फेब्रुवारीलाच कदम यांनी आपल्या जागेला घातलेले कुंपण ग्रामपंचायतीने तोडून नेले. त्यामुळे कदम यांनी ६ फेब्रुवारीला पुन्हा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

झालेला प्रकार पुन्हा त्यांच्या कानावर घातला. त्यांनी पंचायत समितीच्या गट विस्तार अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनी करून जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. मात्र, ६ फेब्रुवारीपासून अजूनपर्यंत याबाबत पुढे कारवाई झालेली नाही.सुभेदार कदम १६ फेब्रुवारीपर्यंत रजा घेऊन आले होते. मात्र, अजूनही प्रश्न न सुटल्याने ते रजा वाढवून घेणार होते. त्याचदरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. ही बातमी समजताच कदम यांनी रजा वाढवण्याचा विचार रद्द केला आहे.

जागेच्या प्रश्नासाठी गेले काही दिवस फिरतोच आहे. मला तेवढ्यासाठी नंतर परत यावे लागले तरी चालेल, पण आता माझ्या जागेपेक्षा देशासमोरील समस्या मोठी आहे आणि सैनिक म्हणून मला माझे कर्तव्य बजावण्यासाठी जायलाच हवे, असे कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यामुळे ते शनिवारी मुंबईकडे रवाना होणार आहेत.जवानांना महत्त्व शहीद झाल्यावरच?काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र हळहळ, शोक, सहानुभूती अशा भावना व्यक्त होत आहेत. जवानांचे महत्त्व फक्त ते शहीद झाल्यावरच समजते का? हयात असलेल्या आणि देशासाठी लढणाऱ्या जवानाचे दु:ख, त्याचा त्रास कोणाला समजत नाही का? असे प्रश्न कदम यांच्या प्रकरणावरून पुढे येत आहेत.

सीमेवर गस्त घालण्याऐवजी कदम सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत आणि अजूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. आता देशाची गरज म्हणून ते परत सीमेवर निघाले आहेत. मात्र, प्रशासनाने कारवाई केलीच नाही तर त्यांना पुन्हा रजा घेऊन देशाच्या नाही तर घराच्या सीमांची काळजी करत बसावी लागेल.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRatnagiriरत्नागिरी