शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

खासगी रक्तविघटन केंद्रांना धडकी!

By admin | Updated: May 29, 2014 00:46 IST

जिल्हा रुग्णालय : रक्त घटकांच्या दर्जाबाबत अफवा

रत्नागिरी : राज्यातील विविध जिल्हा शासकीय रूग्णालयांत शासनामार्फत सामान्य रूग्णांकरिता अद्ययावत रक्तविघटन केंद्र सुरू झाल्याने खासगी रक्त विघटन केंद्र चालकांच्या काळजात धडकी भरली आहे. सक्षमतेने चालणार्‍या शासकीय केंद्राशी स्पर्धा करावी लागत असल्याने शासकीय केंद्रांमधील रक्तघटकांचा दर्जा चांगला नसल्याच्या अफवा काहीजणांकडून पसरविल्या जात आहेत. याबाबत राज्य शासनाने माहिती घेऊन अशा अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रत्नागिरीत २४ मे २०१४ रोजी जिल्हा रुग्णालयातील रक्तविघटन केंद्राच्या उदघाटनासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आले होते. यावेळच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांत अद्ययावत रक्तविघटन केंद्र स्थापन झाल्याने सर्वसामान्यांना कोणत्याही अपघातप्रसंगी वा अन्य कारणाने आवश्यक असल्यास रक्तघटकांची उपलब्धता सुलभ झाली आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी ही शासकीय केंद्र मोठा आधार बनली आहेत. शासकीय रक्तविघटन केंद्रांचे कामही चांगल्या प्रकारे सुरू आहे. यापेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे सुतोवाच आरोग्यमंत्री शेट्टी यांनी रत्नागिरीच्या भेटीत केले आहे. मात्र, शासकीय रक्तविघटन केंद्र सेवा सक्षम होत असताना काही खासगी रक्त विघटन केंद्र व काही डॉक्टर्स यांनी वेगळा पवित्रा घेत काही ठराविकच रक्तविघटन केंद्रातील रक्त घटक चांगल्या दर्जाचे असून, अन्य केंद्रांबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. असे करताना आपलीच मक्तेदारी या क्षेत्रावर निर्माण करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे. शासकीय केंद्रातील रक्त घटक दर्जेदार नाहीत, असे म्हणणार्‍यांना खडसावताना मंत्री शेट्टी म्हणाले, रक्त दर्जेदार नाही म्हणजे ते काय दूध आहे? दुधात पाणी भेसळ केली जाते तसे रक्ताचे आहे काय? केवळ जनतेची दिशाभूल करून आपली मक्तेदारी संपेल, या भीतीने या अफवा पसरविल्या जात आहेत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)