शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रक्तविघटन केंद्रांना धडकी!

By admin | Updated: May 29, 2014 00:46 IST

जिल्हा रुग्णालय : रक्त घटकांच्या दर्जाबाबत अफवा

रत्नागिरी : राज्यातील विविध जिल्हा शासकीय रूग्णालयांत शासनामार्फत सामान्य रूग्णांकरिता अद्ययावत रक्तविघटन केंद्र सुरू झाल्याने खासगी रक्त विघटन केंद्र चालकांच्या काळजात धडकी भरली आहे. सक्षमतेने चालणार्‍या शासकीय केंद्राशी स्पर्धा करावी लागत असल्याने शासकीय केंद्रांमधील रक्तघटकांचा दर्जा चांगला नसल्याच्या अफवा काहीजणांकडून पसरविल्या जात आहेत. याबाबत राज्य शासनाने माहिती घेऊन अशा अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रत्नागिरीत २४ मे २०१४ रोजी जिल्हा रुग्णालयातील रक्तविघटन केंद्राच्या उदघाटनासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आले होते. यावेळच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांत अद्ययावत रक्तविघटन केंद्र स्थापन झाल्याने सर्वसामान्यांना कोणत्याही अपघातप्रसंगी वा अन्य कारणाने आवश्यक असल्यास रक्तघटकांची उपलब्धता सुलभ झाली आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी ही शासकीय केंद्र मोठा आधार बनली आहेत. शासकीय रक्तविघटन केंद्रांचे कामही चांगल्या प्रकारे सुरू आहे. यापेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे सुतोवाच आरोग्यमंत्री शेट्टी यांनी रत्नागिरीच्या भेटीत केले आहे. मात्र, शासकीय रक्तविघटन केंद्र सेवा सक्षम होत असताना काही खासगी रक्त विघटन केंद्र व काही डॉक्टर्स यांनी वेगळा पवित्रा घेत काही ठराविकच रक्तविघटन केंद्रातील रक्त घटक चांगल्या दर्जाचे असून, अन्य केंद्रांबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. असे करताना आपलीच मक्तेदारी या क्षेत्रावर निर्माण करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे. शासकीय केंद्रातील रक्त घटक दर्जेदार नाहीत, असे म्हणणार्‍यांना खडसावताना मंत्री शेट्टी म्हणाले, रक्त दर्जेदार नाही म्हणजे ते काय दूध आहे? दुधात पाणी भेसळ केली जाते तसे रक्ताचे आहे काय? केवळ जनतेची दिशाभूल करून आपली मक्तेदारी संपेल, या भीतीने या अफवा पसरविल्या जात आहेत, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जनतेतून होत आहे. (प्रतिनिधी)