शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पेरणीपूर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात : शेतकऱ्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : रोहिणी नक्षत्राला दिनांक २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. धूळवाफेच्या पेरण्यांना रोहिणी नक्षत्रापासून प्रारंभ होत ...

रत्नागिरी : रोहिणी नक्षत्राला दिनांक २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. धूळवाफेच्या पेरण्यांना रोहिणी नक्षत्रापासून प्रारंभ होत असल्याने शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बहुतांश ठिकाणची भाजावळीची कामे अंतिम टप्प्यात असून, भात बियाणे, खत खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने भातशेती केली जात असल्याने शेतकरीवर्ग पेरणीसाठी बियाणे, खतांची खरेदी करत आहे. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. शिवाय १३ हजार हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड केली जाते. पेरणीपूर्वी मशागतपूर्व कामाचा भाग म्हणून भाजावळीची कामे अद्याप सुरू आहेत. मान्सून सुरू होण्यास अवधी आहे. पेरणी करण्यात येणारी जमीन भाजल्यानंतर सफाई करण्यात येते. सफाईबरोबर शेतामध्ये शेण टाकण्यात येते. कुळीथ व अन्य पिके घेतलेल्या शेतजमिनीत पावसाच्या सुरूवातीलाच धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात. रोहिणी नक्षत्रावर पाऊस पडतो. मात्र, अवकाळी पाऊस हजेरी लावत असतोच. मृग नक्षत्राच्या प्रारंभी सुपीक जमिनीवर पेरणी केली जात असली तरी रोहिणी नक्षत्रातील धूळवाफेच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे.

सध्या आंबा काढणीचे काम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश मजूर आंबा काढणीच्या कामात मग्न आहेत. कलम बागेत शेणखत, सेंद्रियखते रासायनिक खते पावसाळ्यात घालण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. विविध सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकरी खते खरेदी करीत असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त भात बियाणी बाजारात विक्रीसाठी आली आहेत. भात पिकाबरोबर नाचणीचे दुय्यम पीक घेण्यात येते. नाचणी, तृणधान्य, भाजीपाला, कडधान्याच्या बियाण्याची मागणी होत आहे. हळद, आल्याचे बियाणेदेखील विक्रीसाठी तयार करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची, तर ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. जिल्हा फलोत्पादन झाल्यापासून लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. नारळ लागवडही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी, पेरू, चिकू तसेच मसाल्याची रोपे खरेदीसाठी आतापासून संपर्क सुरू केला आहे. रोपांचा दर्जा, दराबाबत घासाघीस सुरू आहे. शासकीय नर्सरी व खासगी नर्सरीतील दरामध्ये फरक असला तरी कलमे / रोपांचा दर्जा पारखला जात आहे.

पाण्याची पातळी खालावल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलावर्ग पायपीट करीत आहेत. शहरात, ग्रामीण भागात टँकर धावत आहेत. नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले असून, कोरोना समाप्तीसह पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे.