शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

पाटीलबुवाच्या मठाची शासनामार्फत चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठाची शासनाकडून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाला पत्र देऊन मठाची चौकशी करण्याबाबतची मागणी करण्याची सूचना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रमुख मुक्ता दाभोलकर यांनी रत्नागिरी येथील बैठकीदरम्यान केली.पाटीलबुवा विरोधात आता सर्वच संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधातील धार अधिक तीव्र झाली आहे.मी ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठाची शासनाकडून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाला पत्र देऊन मठाची चौकशी करण्याबाबतची मागणी करण्याची सूचना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रमुख मुक्ता दाभोलकर यांनी रत्नागिरी येथील बैठकीदरम्यान केली.पाटीलबुवा विरोधात आता सर्वच संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधातील धार अधिक तीव्र झाली आहे.मी रत्नागिरीकर ग्रुप, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधश्रध्दा समिती, लक्ष्यसिध्दी फाऊंडेशन, चेतना फाऊंडेशन, संस्कार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील केतन मंगल कार्यालयात रविवारी आयोजित बुवाबाजीविरोधी संघर्ष सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल विभुते, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सरचिटणीस नितीन राऊत, झरेवाडीचे सरपंच चंद्रकांत गोताड, विलास कोळपे उपस्थित होते.अन्यायग्रस्तांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करीत असतानाच अज्ञानाचा मार्ग अवलंबणाºयांना परत फिरवायचे आहे. गेल्या २७ वर्षांत अंनिसने शेकडो लढाया लढल्या आहेत. एका ठिकाणची बुवाबाजी संपते तेव्हा दुसरीकडे सुरू होणार नाही, याबाबत न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका असली पाहिजे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पाटीलबाबाची चर्चा सुरू आहे. लोक खासगीत बाबाबद्दल खूप बोलतात. परंतु तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी जनतेचे मनोबल वाढवले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील साक्षीदार शोधून पीडित तक्रारदारांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. जादुटोणाविरोधातील कायदा संपूर्ण भारतात लागू व्हावा, ही अंनिसची मागणी आहे. लढाई लढणारे तुम्ही एकटे नाहीत, अंनिस आपल्याबरोबर आहे. परंतु पीडितांनी आवर्जून पुढे येऊन बोलणे आपली जबाबदारी आहे. सध्या ग्रामीण भागातून लोकांचे प्रबोधन करणे, मांत्रिक बाबांची यादी तयार करून पोलिसांना सादर करणे, आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे दाभोलकर यांनी सांगितले.जादूटोणाविरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंनिस प्रयत्नशील आहे. अंनिस छोटी असल्यामुळे तिची ताकद मर्यादित आहे. परंतु जनतेचे जागरूकपणे अशा प्रकारच्या बुवांचा कडाडून विरोध करणे गरजेचे आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक विभुते यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. लोकांचे मनोबल उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यामुळे अन्याय सहन करून गप्प बसण्यापेक्षा त्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.मठ बंद झालाच पाहिजेरत्नागिरीतील बैठक आटोपून मुक्ता दाभोलकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा मठ बंद झालाच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.