शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी वीजबिले भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद लाभत असल्याने अखेर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

गतवर्षी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीच्या रकमेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७० ग्राहकांकडे २३ कोटी ३८ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या १४,६४५ ग्राहकांकडे ८ कोटी ४९ लाख १७ हजार, औद्योगिकच्या १,८०५ ग्राहकांकडे ३ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४,१६० ग्राहकांकडे ७२ लाख ८९ हजार, पथदीपांचे १,५४३ ग्राहकांकडे ९ कोटी ७६ लाख ७३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १,३६५ ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

चिपळूण विभागातील ४३,९६५ ग्राहकांकडे १५ कोटी ७१ हजार ८ रुपये थकीत आहेत. त्यापैकी ३६,५९५ ग्राहकांकडे ७ कोटी ७३ लाख १२ हजार, वाणिज्यिकच्या ४,३६३ ग्राहकांकडे ३ कोटी १५ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ४६२ ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख ९७ हजार, कृषीच्या १,२७१ ग्राहकांकडे २१ लाख २० हजार, पथदीपच्या २२९ ग्राहकांकडे १ कोटी ८१ लाख ६१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३०५ ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ४२,८८५ ग्राहकांकडे १३ कोटी २० लाख ४४ हजार रुपये थकबाकी आहे. पैकी ३५,९८७ घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ५२ लाख २ हजार, ३,४९९ ग्राहकांकडे १ कोटी ८० लाख ३८ हजार, औद्योगिकच्या ३९६ ग्राहकांकडे ९३ लाख ५० हजार, कृषीच्या १,३१० ग्राहकांकडे २२ लाख ८ हजार, पथदीपच्या ४६५ ग्राहकांकडे ३ कोटी १४ लाख ७९, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३९० ग्राहकांकडे एक कोटी ११ लाख ३४ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी विभागातील ७४,०४२ ग्राहकांकडे २४ कोटी ४ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पैकी ५९,४८८ ग्राहकांकडे १० कोटी १३ लाख ६४ हजार, वाणिज्यिकच्या ६,७८३ ग्राहकांकडे ३ कोटी ५२ लाख ९३ हजार, औद्योगिकच्या ९४७ ग्राहकांकडे १ कोटी ७१ लाख ७६ हजार, कृषीच्या १,५७९ ग्राहकांकडे २९ लाख ६१ हजार, पथदीपच्या ८४९ ग्राहकांकडे ४ कोटी ८० लाख ३३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ६७० ग्राहकांकडे एक कोटी २६ लाख १० हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

----------------------------

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी वा इतरांकडून वीज घेणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- विजय भटकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ