शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी वीजबिले भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद लाभत असल्याने अखेर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

गतवर्षी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीच्या रकमेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७० ग्राहकांकडे २३ कोटी ३८ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या १४,६४५ ग्राहकांकडे ८ कोटी ४९ लाख १७ हजार, औद्योगिकच्या १,८०५ ग्राहकांकडे ३ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४,१६० ग्राहकांकडे ७२ लाख ८९ हजार, पथदीपांचे १,५४३ ग्राहकांकडे ९ कोटी ७६ लाख ७३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १,३६५ ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी आहे.

चिपळूण विभागातील ४३,९६५ ग्राहकांकडे १५ कोटी ७१ हजार ८ रुपये थकीत आहेत. त्यापैकी ३६,५९५ ग्राहकांकडे ७ कोटी ७३ लाख १२ हजार, वाणिज्यिकच्या ४,३६३ ग्राहकांकडे ३ कोटी १५ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ४६२ ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख ९७ हजार, कृषीच्या १,२७१ ग्राहकांकडे २१ लाख २० हजार, पथदीपच्या २२९ ग्राहकांकडे १ कोटी ८१ लाख ६१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३०५ ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकबाकी आहे.

खेड विभागातील ४२,८८५ ग्राहकांकडे १३ कोटी २० लाख ४४ हजार रुपये थकबाकी आहे. पैकी ३५,९८७ घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ५२ लाख २ हजार, ३,४९९ ग्राहकांकडे १ कोटी ८० लाख ३८ हजार, औद्योगिकच्या ३९६ ग्राहकांकडे ९३ लाख ५० हजार, कृषीच्या १,३१० ग्राहकांकडे २२ लाख ८ हजार, पथदीपच्या ४६५ ग्राहकांकडे ३ कोटी १४ लाख ७९, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३९० ग्राहकांकडे एक कोटी ११ लाख ३४ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी विभागातील ७४,०४२ ग्राहकांकडे २४ कोटी ४ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पैकी ५९,४८८ ग्राहकांकडे १० कोटी १३ लाख ६४ हजार, वाणिज्यिकच्या ६,७८३ ग्राहकांकडे ३ कोटी ५२ लाख ९३ हजार, औद्योगिकच्या ९४७ ग्राहकांकडे १ कोटी ७१ लाख ७६ हजार, कृषीच्या १,५७९ ग्राहकांकडे २९ लाख ६१ हजार, पथदीपच्या ८४९ ग्राहकांकडे ४ कोटी ८० लाख ३३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ६७० ग्राहकांकडे एक कोटी २६ लाख १० हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

----------------------------

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी वा इतरांकडून वीज घेणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- विजय भटकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल