शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी वीजबिले भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद लाभत असल्याने अखेर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

गतवर्षी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीच्या रकमेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७० ग्राहकांकडे २३ कोटी ३८ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या १४,६४५ ग्राहकांकडे ८ कोटी ४९ लाख १७ हजार, औद्योगिकच्या १,८०५ ग्राहकांकडे ३ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४,१६० ग्राहकांकडे ७२ लाख ८९ हजार, पथदीपांचे १,५४३ ग्राहकांकडे ९ कोटी ७६ लाख ७३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १,३६५ ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी आहे.

चिपळूण विभागातील ४३,९६५ ग्राहकांकडे १५ कोटी ७१ हजार ८ रुपये थकीत आहेत. त्यापैकी ३६,५९५ ग्राहकांकडे ७ कोटी ७३ लाख १२ हजार, वाणिज्यिकच्या ४,३६३ ग्राहकांकडे ३ कोटी १५ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ४६२ ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख ९७ हजार, कृषीच्या १,२७१ ग्राहकांकडे २१ लाख २० हजार, पथदीपच्या २२९ ग्राहकांकडे १ कोटी ८१ लाख ६१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३०५ ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकबाकी आहे.

खेड विभागातील ४२,८८५ ग्राहकांकडे १३ कोटी २० लाख ४४ हजार रुपये थकबाकी आहे. पैकी ३५,९८७ घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ५२ लाख २ हजार, ३,४९९ ग्राहकांकडे १ कोटी ८० लाख ३८ हजार, औद्योगिकच्या ३९६ ग्राहकांकडे ९३ लाख ५० हजार, कृषीच्या १,३१० ग्राहकांकडे २२ लाख ८ हजार, पथदीपच्या ४६५ ग्राहकांकडे ३ कोटी १४ लाख ७९, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३९० ग्राहकांकडे एक कोटी ११ लाख ३४ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी विभागातील ७४,०४२ ग्राहकांकडे २४ कोटी ४ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पैकी ५९,४८८ ग्राहकांकडे १० कोटी १३ लाख ६४ हजार, वाणिज्यिकच्या ६,७८३ ग्राहकांकडे ३ कोटी ५२ लाख ९३ हजार, औद्योगिकच्या ९४७ ग्राहकांकडे १ कोटी ७१ लाख ७६ हजार, कृषीच्या १,५७९ ग्राहकांकडे २९ लाख ६१ हजार, पथदीपच्या ८४९ ग्राहकांकडे ४ कोटी ८० लाख ३३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ६७० ग्राहकांकडे एक कोटी २६ लाख १० हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

----------------------------

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी वा इतरांकडून वीज घेणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- विजय भटकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल