शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

कोंबडी वाटप गाजवले

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

चव्हाण यांची मागणी : चिपळूण पंचायत समिती सभा

अडरे : चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात सदस्यांना विश्वासात न घेता कोंबड्यांचे परस्पर वाटप केल्याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जीतेंद्र चव्हाण यांनी आज मंगळवारी झालेल्या मासिक सभेत केली.चिपळूण शहरातील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी ११.३० वाजता पंचायत समितीची मासिक सभा सभापती समिक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सुचिता सुवार, गटविकास अधिकारी गणेश पिंपळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले आदींसह सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्य उपस्थित होते.पंचायत समितीच्या सेस फंडातून २५५ कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या रामपूर गणात ४ कोंबड्या व १ कोंबडा अशा एकूण ५ याप्रमाणे परस्पर सदस्यांना विश्वासात न घेता वाटप करण्यात आले. या विषयावरुन सभेत गदारोळ झाला. याप्रकरणी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक सकपाळ यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.या चौकशी प्रकरणाबाबत ठरावही करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंप कनेक्शन जोडणी गेली २ वर्ष महावितरण कंपनीने दिलेली नाहीत. केवळ टेंडर प्रक्रियाच सुरुच असते. याबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही असा आरोप सदस्य रघुनाथ ठसाळे यांनी केला. चिपळूण पंचायत समितीच्या मााासिक सभेत सदस्यांनी आक्रमक होत विविध प्रश्नांवर उहापोह केला. अवकाळी पाऊस, वीज जोडण्या, पाणी , पशुसंवर्धन विभाग याबाबत गांभिर्याने चर्चा करण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी अज्ञान आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून सर्व्हे करावा आणि योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुरेश खापले यांनी केली. आज झालेल्या सभेत बांधकाम विभाग, एस. टी. महामंडळ, आरोग्य, पाणी पुरवठा, सामाजिक वनीकरण, रस्ते आदी कामांबाबतही चर्चा झाली. चर्चेत सदस्य सहभागी झाले होते. (वार्ताहर)चौकशीचा ठराव...चिपळूण तालुका पंचायत समितीची मासिक सभा आज पंचायत समंतिीचे माजी सभापती जीतेंद्र चव्हाण यांनी वादळी चर्चा करून गाजविली. सदस्यांना विश्वासात न घेता कुक्कुट वाटप करण्यात आला. यातील दोषींची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. रामपूर गणात सदस्यांना विश्वासात न घेता कुक्कुट वाटप झाल्याने चव्हाण हे संतप्त झालेव त्यांनी या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला. चौकशी करणारा ठराव करण्यात आला. या ठरावानंतर पंचायत समिती परिसरात खळबळ माजली आहे.