शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

चिपळूणच्या विकासात राजकीय खो कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:10 IST

Politics Chiplun Sindhudurg- गेल्या दोन वर्षांत शहरातील विकास कामांचा आढावा घेतला, तर नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकहाती सत्ता असूनही फारसा फायदा झालेला नाही. उलट विकासात्मक कामं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. वर्षानुवर्षे बंद असलेले प्रकल्प आणि नवीन कामंही राजकारणाचे बळी ठरल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकहाती सत्ता असल्याने चिपळूणचा विकास जलद गतीने होण्याची आशा होती. मात्र, राजकीय खो शहराच्या विकासाला बाधा ठरत आहे.

ठळक मुद्देचिपळूणच्या विकासात राजकीय खो कायममहाविकास आघाडी - भाजपमधील वाद टोकाला

चिपळूण : गेल्या दोन वर्षांत शहरातील विकास कामांचा आढावा घेतला, तर नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या रूपाने एकहाती सत्ता असूनही फारसा फायदा झालेला नाही. उलट विकासात्मक कामं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. वर्षानुवर्षे बंद असलेले प्रकल्प आणि नवीन कामंही राजकारणाचे बळी ठरल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकहाती सत्ता असल्याने चिपळूणचा विकास जलद गतीने होण्याची आशा होती. मात्र, राजकीय खो शहराच्या विकासाला बाधा ठरत आहे.साधारण चार वर्षांच्या कालावधीत नगराध्यक्षा खेराडे यांनी कोट्यवधीची कामे केली. शिवसेनेचा कडवा विरोध झिडकारून त्यांनी विकास कामांचा धडाका लावला. अनेक धाडसी निर्णय घेतले. ग्रॅव्हिटी पाणी योजना, भुयारी गटार योजना, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, अत्याधुनिक अग्निशमन बंब अशा कामांमध्ये नक्कीच धाडस केले आहे. यासह अन्य कामांसाठी नगरपरिषद अधिनियम ५८(२)चा त्यांनी वापर केला.

प्रत्येक वेळी त्यांना विरोध झाला, परंतु कधीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही. विरोधकांनी जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे अनेक तक्रारी केल्या, परंतु आजपर्यंत त्या तक्रारींचा खेराडे यांच्या कामावर कोणताही परिणाम झाला नाही. आपत्कालीन परिस्थितीतच अधिनियम ५८(२)चा वापर करता येतो.

त्यामुळे त्यांच्यावर वेळोवेळी या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचा आक्षेप घेतला गेला. त्याही शहराच्या विकासासाठी काम करीत राहणार, पदाची पर्वा करणार नाही, या मताशी आजपर्यंत ठाम राहिल्या. उलट जेवढा विरोध तेवढ्याच सक्रियपणे त्या काम करताना दिसल्या. विरोधकच त्यांची ताकद असल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले.सुरुवातीला त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन कामं केली. मात्र, राज्यात जसे महाविकास आघाडीचे वारे वाहू लागले बदल येथेही घडून आला. त्यामुळे नगरपरिषदेत एकप्रकारे महाविकास आघाडीची सत्ता आली. भाजपच्या नगराध्यक्षा असल्या, तरी महाविकास आघाडीत शिवसेनेचे ११, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे ४ आणि अपक्ष २ असे २२ नगरसेवकांचे राजकीय बलाबल निर्माण झाले. त्यांच्यासमोर नगराध्यक्षा व त्यांचे चार सहकारी नगरसेवकांची ताकद नेहमीच अपुरी पडली.

अशा परिस्थितीचा फायदा उठवत, महाविकास आघाडी विकास कामांचा धडाका लावेल, असे अपेक्षित होते. मात्र, उलट अनेक कामांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली. त्यातून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने सुरू केले. त्या मनमनी कारभार करतात, नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, असे आरोप त्यांच्यावर केले. त्यानंतर, १७ कामांविषयी आक्षेप नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.जिल्हाधिकारी यांनी सुनावणीनंतर या वादग्रस्त कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी त्याला तत्काळ मंजुरीही दिली. असे असले, तरी अजूनही अर्थसंकल्प व सुधारित कामांचा गुंता सुटलेला नाही. परिणामी, शहरातील अंतर्गत रस्ते, सांस्कृतिक केंद्र, भाजी मंडईसारखे प्रकल्प वर्षानुवर्षे बंदच राहिले आहेत.नेतेही ठरले अपयशी!आतापर्यंत चिपळूण नगरपरिषदेच्या राजकारणात उच्च तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांनी लक्ष दिले असले, तरीही हा गुंता सुटलेला नाही. सामंत यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही आघाडीच्या नगरसेवकांनी नाट्यगृहातील कामांना मुदतवाढ नाकारली. त्यामुळे नेतेही अपयशी ठरले.अर्थसंकल्प पुन्हा अडचणीतयेथील नगर परिषदचा २०१९-२० आणि २०२०-२०२१चा अर्थसंकल्प आजही गुंतागुंतीच्या प्रक्रियेत अडकला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत वादग्रस्त १९ कामांच्या चौकशीला अधीन राहून महाविकास आघाडीने ठराव मंजूर केल्याने, नगरपरिषदेचे अर्थसंकल्प पुन्हा अडचणीत आले आहे.

महाविकास आघाडीला सुधारित कामं व वाढीव कामं यातील फरकच कळत नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जी कामं आज वादग्रस्त ठरत आहेत, ते निव्वळ पाठीत खंजीर खुपसल्यामुळेच वादग्रस्त बनली आहेत. एका सभेत शासकीय निधीतून होणारी ६१ कामं याच महाविकास आघाडीने नाकारली. आज त्यांच्याच नाकर्तेपणामुळे स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचा अडीच कोटींचा व अन्य निधी परत जाण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीच्या या भूमिकेमुळे प्रशासनही ताक फुंकून घेत आहे. साहजिकच, त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे.- विजय चितळे,नगरसेवक, भाजप

ज्या कामांची निविदा प्रक्रिया झालेली नाही, कामाचे आदेश नाहीत व ठेकेदाराशी करारनामा झालेला नाही, अशाच १९ चुकीच्या कामांना महाविकास आघाडीने विरोध केला आहे. या प्रक्रिया ज्या कामांमध्ये राबविल्या गेल्या, त्याला महाविकास आघाडीने कधीही विरोध केलेला नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे थांबलेल्या ६ कोटी २२ लाखांच्या १७ कामांना पालकमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ती निविदा प्रक्रिया राबविलेली कामं आहेत. उक्ताड पार्किंगचे २४ लाखांचे काम निविदाच नाही, अशा कामांना व ५८(२)च्या कामांना विरोध केला आहे.- राजेश केळसकर, नगरसेवक, महाविकास आघाडी

टॅग्स :PoliticsराजकारणChiplunचिपळुणsindhudurgसिंधुदुर्ग