शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ रुग्णालय सुरू करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : गेल्या काही दिवसात एका काेविड केअर सेंटरच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयाला मान्यता ...

रत्नागिरी : गेल्या काही दिवसात एका काेविड केअर सेंटरच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहेत. वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयाला मान्यता देण्यासाठी नाचणे परिसरातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रही दिले हाेते. राजकीय हस्तक्षेपामुळेच हे रुग्णालय सुरू करण्यात आले असून, अनुभवी डाॅक्टरांशिवाय या रुग्णालयाला मान्यता कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काेराेना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने अनेकांच्या पाेटात भीतीचा गाेळा येत आहे. त्यामुळे अनेकजण जीव वाचविण्यासाठी रुग्णालयांचा आधार घेत आहेत. सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय रुग्णालयातील बेडही कमी पडत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना काेविड सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी मिळाल्यानंतर अनेकांनी त्याआधारे डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी नाचणे परिसरात एक हाॅटेलरूपी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर या रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला.

नाचणे परिसरात काेविड सेंटर सुरू हाेण्यासाठी या भागातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची बाब समाेर आली आहे. त्यासाठी त्यांनी साेशल मीडियाच्या माध्यमातून लाेकांना एकत्र येण्याचे आवाहन केले हाेते. एका ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले. हे रुग्णालय सुरुवातीच्या काळात शांतिनगर परिसरात उभारण्याच्या हालचाली सुरू हाेत्या. त्यानंतर त्याची जागा बदलून महामार्गालगत सुरू करण्यात आले. याठिकाणी काम करत असलेल्या ॲलाेपॅथिक डाॅक्टरचे नावही याच पदाधिकाऱ्यांनी सुचविले हाेते.

हे रुग्णालय सुरू हाेण्यासाठी धडपडणारे लाेकप्रतिनिधी तेथील गलथान कारभाराबाबत आता गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घाईघाईत हे रुग्णालय सुरू करण्यामागचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. ज्या रुग्णालयात आयुर्वेदिक आणि ॲलाेपॅथिकचे डाॅक्टर काेराेनावर उपचार करणार असतील, त्या रुग्णालयाला काेणत्या निकषावर परवानगी देण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे. या संपूर्ण कारभाराची चाैकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.