शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

राजकीय सोयीची ‘मिसळ’

By admin | Updated: January 23, 2016 00:46 IST

सभापतींचा पक्ष कुठला : कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात जिल्ह्यात पक्षांतराचे पेवच फुटले आहे. एका पक्षातून निवडून आलेले लोक दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसण्याचा चमत्कार सध्या सातत्याने घडतो आहे. रत्नागिरी पंचायत समितीत शिवसेनेच्या पुढाकाराने सभापती झालेले महेश तथा बाबू म्हाप हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य. जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून शिक्षण समिती सभापती झालेले विलास चाळके हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य. या मिसळीमुळे सध्या कोण कोणत्या पक्षाचा याबाबत कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत.जिल्हा परिषदेत शिवसेनेचे प्राबल्य असतानाही केवळ राजकीय स्वार्थासाठी तत्कालीन समाजकल्याण सभापती भगवान घाडगे यांना बाजूला करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या शीतल जाधव यांना राजापूर येथे एका कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश देऊन एका रात्रीत त्यांना समाजकल्याण सभापतीपद बहाल केले. त्याची किंमत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना मोजावी लागली. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचेही तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेना आणि भाजपाचा तंबू गाठला आहे. त्यापैकी शिवसेनेच्या तंबूत गेलेले माजी आमदार सुभाष बने समर्थक विलास चाळके यांच्याही गळ्यात प्रवेशानंतर दुसऱ्याच वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व वित्त सभापतीपदाची माळ घालण्यात आली. यावेळी इच्छुकांची संख्याही नेहमीप्रमाणेच होती. रत्नागिरी पंचायत समितीमध्ये आमदार उदय सामंत समर्थक बाबू म्हाप सभापती झाले. ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर पंचायत समिती सदस्य झाले आणि शिवसेनेच्या पुढाकाराने पंचायत समिती सभापती झाले. ते आमचेच असल्याचा दावा आता राष्ट्रवादीने केला आहे.शिवसेनेकडे सभापतीपदांसाठी उमेदवार असतानाही इतर पक्षांमधून आलेल्या सदस्यांना पुनर्वसनासाठी ही पदे देण्यात आली. राष्ट्रवादीच्या शीतल जाधव, बाबू म्हाप आणि काँग्रेसचे विलास चाळके यांनी शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला नाही. ते तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीत शिवसेनेचे प्राबल्य असतानाही राजकीय सोय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य आज सभापतीपदावर विराजमान आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत. (शहर वार्ताहर)तोंड वेगवेगळ्या दिशेला : दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभजिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युती असली तरी आता दोघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी तुझ्याविना करमेना..., अशी स्थिती आहे. मात्र, हे संबंध यापुढे असेच राहिल्यास त्याचा लाभ तिसऱ्यालाच होणार, हे आता सध्याच्या राजकारणावरून स्पष्ट झाले आहे.कानामागून आली...रत्नागिरी तालुक्यातील राजकारणात वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना मर्जीची पदे देण्याची किमया होऊ लागली आहे. त्यामुळे ‘काना मागून आले...’ अशीच तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.