शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

राजकीय धूळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST

गेल्या दीड वर्षापूर्वी काेरोनाने शिरकाव केला. पहिली लाट काही काळ शमल्यानंतर मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या रूपातील विषाणूची दुसरी ...

गेल्या दीड वर्षापूर्वी काेरोनाने शिरकाव केला. पहिली लाट काही काळ शमल्यानंतर मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या रूपातील विषाणूची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेने हैदोस घालून लाखो नागरिकांना बाधित केले आणि पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने जीवही घेतले. कोरोनाकाळात संसर्ग रोखण्यासाठी नाइलाजाने लाॅकडाऊन करावे लागले. या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घरातच रहावे म्हणून पोलीस यंत्रणा लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून रस्त्यावर अहोरात्र गस्त घालत आहेत. कोरोनाचे संकट असतानाच अपघात, नैसर्गिक आपत्ती यासारखी संकटे, मंत्री, लोकप्रतिनिधी यांचे दाैरे आदी सर्वच आघाड्यांवर ही यंत्रणा गुंतलेली आहे. आधीच या महत्त्वाच्या असणाऱ्या यंत्रणेत मनुष्यबळ कमी, त्यामुळे आहे त्यांच्यावरच अधिक ताण येत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. त्यामुळेच सामान्य नागरिकांचे जीव कोरोनापासून वाचत आहेत.

मात्र, या संकटाबाबत राजकारणात फारसे कुणाला काही पडलेले दिसत नाही. कोरोना किंवा काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने चिपळूण, खेड या भागातील लोकांचे सर्वस्व वाहून नेले. मात्र, पाहायला आलेल्या राजकारण्यांमध्येसुद्धा श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे दाैरे उत्साहाने होत होते. आपत्तीने कोलमडून गेलेल्या लोकांच्या हातात जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली भीक दिल्यासारख्या वस्तू देऊन फोटोसेशन केले जात होते. हे सगळं चित्र मनात किळस निर्माण करणारे असेच होते.

सध्या राजकारणात जी काही बजबजपुरी माजली आहे, ती पाहात महाराष्ट्रातही बिहारसारखी राजकीय संस्कृती निर्माण व्हायला आता वेळ लागणार नाही, याचे संकेत मिळू लागले आहेत. यात सामान्य जनतेचे अस्तित्व विचारात घेतले जात असल्याचे दिसून येत नाही. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. नुकताच चिपळूण येथे आलेल्या महापुरानंतर अनेक मंत्र्यांचे, माजी मंत्र्यांचे दाैरे या भागात झाले, त्यावेळी या लोकांकडून व्यक्त झालेल्या तीव्र भावना हे याचे द्योतक आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निदान आता तरी राजकारण्यांनी यातून काहीतरी शिकावं आणि राजकारणातील धूळफेक थांबवावी.