शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय धूळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST

गेल्या दीड वर्षापूर्वी काेरोनाने शिरकाव केला. पहिली लाट काही काळ शमल्यानंतर मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या रूपातील विषाणूची दुसरी ...

गेल्या दीड वर्षापूर्वी काेरोनाने शिरकाव केला. पहिली लाट काही काळ शमल्यानंतर मार्च २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या रूपातील विषाणूची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेने हैदोस घालून लाखो नागरिकांना बाधित केले आणि पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने जीवही घेतले. कोरोनाकाळात संसर्ग रोखण्यासाठी नाइलाजाने लाॅकडाऊन करावे लागले. या काळात संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घरातच रहावे म्हणून पोलीस यंत्रणा लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून रस्त्यावर अहोरात्र गस्त घालत आहेत. कोरोनाचे संकट असतानाच अपघात, नैसर्गिक आपत्ती यासारखी संकटे, मंत्री, लोकप्रतिनिधी यांचे दाैरे आदी सर्वच आघाड्यांवर ही यंत्रणा गुंतलेली आहे. आधीच या महत्त्वाच्या असणाऱ्या यंत्रणेत मनुष्यबळ कमी, त्यामुळे आहे त्यांच्यावरच अधिक ताण येत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. त्यामुळेच सामान्य नागरिकांचे जीव कोरोनापासून वाचत आहेत.

मात्र, या संकटाबाबत राजकारणात फारसे कुणाला काही पडलेले दिसत नाही. कोरोना किंवा काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुराने चिपळूण, खेड या भागातील लोकांचे सर्वस्व वाहून नेले. मात्र, पाहायला आलेल्या राजकारण्यांमध्येसुद्धा श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे दाैरे उत्साहाने होत होते. आपत्तीने कोलमडून गेलेल्या लोकांच्या हातात जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली भीक दिल्यासारख्या वस्तू देऊन फोटोसेशन केले जात होते. हे सगळं चित्र मनात किळस निर्माण करणारे असेच होते.

सध्या राजकारणात जी काही बजबजपुरी माजली आहे, ती पाहात महाराष्ट्रातही बिहारसारखी राजकीय संस्कृती निर्माण व्हायला आता वेळ लागणार नाही, याचे संकेत मिळू लागले आहेत. यात सामान्य जनतेचे अस्तित्व विचारात घेतले जात असल्याचे दिसून येत नाही. याचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. नुकताच चिपळूण येथे आलेल्या महापुरानंतर अनेक मंत्र्यांचे, माजी मंत्र्यांचे दाैरे या भागात झाले, त्यावेळी या लोकांकडून व्यक्त झालेल्या तीव्र भावना हे याचे द्योतक आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निदान आता तरी राजकारण्यांनी यातून काहीतरी शिकावं आणि राजकारणातील धूळफेक थांबवावी.