शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

चोरद नदीवरील पुलाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:41 IST

दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग कोसळण्याच्या स्थितीत

आॅनलाईन लोकमतखेड (जि. रत्नागिरी), दि. २२ : खेड - आंबवली मार्गावरील भरणे - सुकिवलीदरम्यान बांधण्यात आलेल्या चोरद नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूस केलेल्या भरावाला संरक्षक भिंत न बांधल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची जातीनिशी पाहणी करून हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास याविरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश घोले यांनी दिला आहे़ सुकिवली येथील चोरद नदीवर बांधण्यात आलेला हा पूल गेली ६० वर्षे आपले अस्तित्व टिकवून होता. या पुलाची डागडुजी करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पुराचे पाणी पुलावर येत असे.़ त्यामुळे साहजिकच खेड-आंबवली तसेच अठरागाव धवडे-बांदरी विभागातील जनतेचे यावेळी मोठे हाल होत असत. या सर्व बाबींचा विचार करता येथे नव्याने पुलाची उभारणी करण्याची जनतेची मागणी आहे.आघाडी सरकारच्या काळात या पुलाला निधी उपलब्ध झाला. गेली दोन वर्षे या पुलाचे काम सुरू होते. पुलाचे काम जून २०१७मध्ये पूर्ण झाले आणि वाहतूक सुरू झाली. याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचा भराव करण्यात आला आहे. मात्र, हा भराव पावसाळ्यात वाहून जाणार हे निश्चित होते. या भरावासाठी येथे संरक्षक भिंतदेखील बांधण्यात आलेली नाही़ त्यामुळे ऐन पावसामध्ये मातीचा हा भराव खालील बाजूला सरकू लागला आहे. काही दिवसातच हा भराव संपूर्णपणे खचण्याची शक्यता आहे.़ यामुळे दोन्ही बाजूच्या रस्ता खचणार असून, पुलाच्या काही भागाला याचा धोका निर्माण होणार आहे.