शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बार्टीच्या समतादूतांमार्फत ५४ हजार वृक्षारोपण लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

आबलोली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), ...

आबलोली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, समतादूत प्रकल्पांतर्गत दिनांक ५ जून ते २६ जूनदरम्यान वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानात बार्टीच्या समतादूतांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात ५०,००० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. वड पिंपळ, कडुनिंब, साग, शिवण, वड, खैर, चिंच, बदाम, मोह, आवळा, काजू, करंज इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड हाच पर्याय आहे. सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व जाणिवेसह अधोरेखित झाले आहे. बार्टीचे प्रत्येक तालुक्यात समतादूत कार्यरत आहेत. बार्टीच्या विविध उपक्रमांची तळागाळापर्यंत माहिती देऊन त्यांची अंमलबजावणी हे समतादूत करीत आहेत.

या अभियानासाठी महासंचालक बार्टी, पुणे, तसेच प्रकल्प अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच लावलेले वृक्ष जगविण्याची स्थानिक पातळीवरील नागरिक/प्रतिनिधी व समतादूत यांनी जबाबदारी घेतली आहे. बार्टीमार्फत विभागनिहाय पुणे १८,२००, औरंगाबाद ४,४५९, अमरावती १८,१५६, नाशिक ४,६६६, लातूर २,६७१, नागपूर ३,८४१, कोकण २,५७२ अशा एकूण ५४,५६५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.