शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

खेड : पर्यावरणाचा समतोल राखावा या हेतूने येथील शिवसेना, युवा सेना आणि युती सेनेच्यावतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. लोटेमाळ ...

खेड : पर्यावरणाचा समतोल राखावा या हेतूने येथील शिवसेना, युवा सेना आणि युती सेनेच्यावतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. लोटेमाळ येथे झालेल्या या उपक्रमावेळी युवा सेनेचे उपतालुकाधिकारी केतन वारणकर, रोहन कालेकर, सौरभ चाळके, प्रसाद सावंत, धनंजय पटवर्धन, सचिन कालेकर, रुपेश काटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विजेचा लपंडाव कायम

चिपळूण : शहरानजीकच्या गोवळकोट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या लपंडावाला सुरुवात झाली आहे. दिवसातून सतत चार ते पाचवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने सध्या ऑनलाईन कामावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेकांचे सध्या वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने त्यात व्यत्यय येत आहे.

जनजागृती मोहीम

साखरपा : पिकांचे उत्पादनक्षम क्षेत्र वाढावे, शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारावा यासाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेबाबत कृषी विभागातर्फे संगमेश्वर तालुक्याच्या विविध विभागांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शिरगाव : विस्टी ऑन टेक्निकल आणि सर्व्हीसेस सेंटर पिंपरी चिंचवड आणि चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक संघाच्या सहकार्याने कोळकेवाडीतील अनेक गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव दीपक माने, कोळकेवाडी सरपंच पल्लवी शिंदे तसेच कंपनीचे अध्यक्ष आशिष भाटीया आदी उपस्थित होते.

विद्युत खांब बदला

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवडे आदिष्टी वाडीतील गंजलेले आणि धोकादायक विद्युत खांब याबाबत तक्रार करूनही ते बदलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत इथल्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून तक्रार नोंदवूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.

खासगी संस्थांचा पुढाकार

रत्नागिरी : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कांदळवन विभागाने पुढाकार घेतला आहे. कांदळवनाच्या संरक्षणासाठी शासनाने नवीन कायदा तयार केल्याने लागवड क्षेत्र वाढले आहे. कांदळवन तोडीचे प्रमाण घटून क्षेत्र वाढविण्याकरिता आता खासगी संस्थांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे वर्षभरात हे क्षेत्र अधिकच वाढेल.

सामाजिक बांधिलकी

देवरुख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाद्वारे सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. गेल्या आठवड्यात सायले, काटवली परिसरातील ग्रामस्थांना स्वयंरोजगारासाठी घरघंटीचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन काळात गरीब कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे.

संरक्षक भिंत कोसळली

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे करंदीकरवाडी ते कालिका मंदिर रस्त्याजवळील संरक्षक भिंत अतिवृष्टीत कोसळली आहे. जमीन २० फूट खोल खचून पूर्णत: वाहुन गेली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. ग्रामस्थांनी बौद्धवाडी रस्त्याचा पर्याय वापरावा, असे आवाहन मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतीने केले आहे.

घाटासाठी बंदी

खेड : रघुवीर घाट या खोपी शिरगाव परिसरातील पर्यटन स्थळाकडे जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. खेडचे उपविभागीय अधिकारी अविषकुमार सोनोने यांनी या आशयाचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सध्या या ठिकाणी मनाई करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण

सावर्डे : चिपळूण शहरातील मुरादपूर प्रभाग क्रमांक १ मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम नुकतीच राबविण्यात आली. मुरादपूर येथील महाराष्ट्र हायस्कूल येथे लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. नगर परिषदेतील आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी, रौस वांगडे तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते.

मोरी खचली

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे रस्त्यावरील मोरी खचल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी दोन तासांहून अधिक काळ बंद होती. तालुक्यातील अनेक मार्गांवर मोरी खचण्याचे प्रकार घडले. तसेच अनेक झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे तालुक्याच्या अंतर्गत भागातील वाहतूक अंशत: विस्कळीत झाली होती.

खड्ड्यांचे साम्राज्य

चिपळूण : काडवली ते निर्बाडे या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सध्या पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. वाहन चालकांना पाण्यामध्ये या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने खड्डे भरण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

फळबाग लागवड

दापोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दापोली मतदार संघात किमान १०० हेक्टरवर लागवड करण्याचा निर्धार येथील कृषी विभागाने केला आहे. खेड, दापोली, मंडणगड येथील कृषी पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शासनाच्या या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

किल्ल्याचे संवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शहरातील रत्नदुर्ग किल्ला हा पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र, या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या किल्ल्याच्या परिसरातील तटबंदी नादुरुस्त होऊ लागली आहे. भगवती मंदिर ते दीपगृह या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

धरणे भरली

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणारी तालुक्यातील शीळ आणि पानवल येथील धरणे पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागली आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भरणाऱ्या या धरणातील पाण्याचा कोटा आताच पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शहराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.