शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडवर योजना रुसल्या

By admin | Updated: June 8, 2014 00:56 IST

शासकीय योजना : अधिकारी, लोकप्रतिनिधींचे लक्षच नाही

शोभना कांबळे - रत्नागिरी विविध शासकीय योजना मोठा गाजावाजा करून सुरू केल्या जातात, त्या लोकार्पणही व्यवस्थित होतात. मात्र, त्याचं पाणी ज्यांच्यापर्यंत झिरपायला हवं, तेथे झिरपतच नाही. रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात या योजनांबाबत एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मंडणगडमध्ये इंदिरा गाधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती योजनेचा एकही लाभार्थीच नाही, असं दिसून आल्याने या योजना मंडणगडसाठी नाहीच का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ मार्च २०१४ अखेर जिल्ह्यातील ३४,७९४ जणांना मिळाला आहे. राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गाधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती योजना या चार योजना राबविण्यात येतात. शासनाच्या सर्व योजना जनतेच्या कल्याणासाठीच असतात. मात्र, त्या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्यासाठी त्याची प्रसिद्धी आणि अंमलबजावणी दोन्हीही प्रभावपणे व्हायला हवी. त्याचा अभाव जाणवत असल्यानेच काही गावे या योजनांपासून वंचित रहातात. मंडणगड तालुका हे याचे द्योतक आहे. या योजनांपैकी दोन योजनांचे म्हणजेच इंदिरा गाधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती योजनेचा एकही लाभार्थी मंडणगडमध्ये नसल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे विकासापासून मागे राहिलेल्या या जिल्ह्याच्या एका टोकाकडे राज्यकर्त्यांचेही लक्ष नाही आणि अधिकाऱ्यांचेही नाही. त्यामुळे या योजना तेथील लाभार्थी होऊ शकणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही, असे म्हटले जात आहे. या योजनांतर्गत निराधार असलेल्या १८ ते ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तिंना विविध योजनांतर्गत लाभ मिळवून दिला जातो. या योजनेंतर्गत लाभार्थींना ६०० रूपये एवढी आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली जाते. गतवर्षी एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत शासकीय योजनांचा जिल्ह्यातील ३४,७९४ लाभार्थींनी लाभ घेतला होता. राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ १०,५९६, तर श्रावणबाळ योजनेचा लाभ १३,२८० लाभार्थींनी घेतला. मंडणगडमध्ये मात्र, निराधार विधवा आणि अपंग यांचा एकही प्रस्ताव वर्षभरात आलेला नाही. तसेच दापोलीतही अपंग निराधार व्यक्तिचा एकही प्रस्ताव दाखल नाही. शासनाच्या या योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरापर्यंत उपलब्ध असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन दिसतात. त्यामुळे अनेक गावातील पात्र लाभार्थी या योजनांपासून वंचित राहात असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)