शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Lok Sabha Election 2019 : रत्नागिरीत शासनाच्या विविध योजनांचे पोस्टर तत्काळ हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योजनांचे पोस्टर्स गेले असून, जागृतीचे फलक झळकू लागले आहेत.

ठळक मुद्देयोजना गेल्या अन् आली जागृती!शासनाच्या विविध योजनांचे पोस्टर तत्काळ हटविले

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे एस्. टी. बसवर लावण्यात आलेले शासकीय योजनांचे फलक (पोस्टर) काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी आता मतदार नोंदणी करणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांवरील योजनांचे पोस्टर्स गेले असून, जागृतीचे फलक झळकू लागले आहेत.निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात शासनाच्या कोणत्याही कामांची माहिती प्रसिद्ध करता येत नाहीत. तसेच शासनाच्या योजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर्स, बॅनर तत्काळ हटविण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एस्. टी. बसवर जाहिरातींचे पोस्टर्स चिकटविण्यात आले होते.

केंद्रशासनाच्या योजनांसह राज्यातील योजनांचाही यामध्ये समावेश होता. निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच शासनाच्या या योजनांचे पोस्टर्स हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार एस्. टी. महामंडळाने गाड्यांवर चिकटवलेले पोस्टर्स काढून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार ही पोस्टर्स हटविण्यात आली आहेत. त्यामुळे आता योजनांची पोस्टर्स गाड्यांवर दिसून येत नाहीत.या पोस्टर्सऐवजी मतदार नोंदणी जागृतीची पोस्टर्स चिकटविण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका, असा संदेश या पोस्टर्सवरून देण्यात आला आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी आपली नोंदणी करून मतदानाचा हक्क बजवावा, असा यामागचा उद्देश आहे.जनजागृतीच्या पोस्टर्सचे प्रमाण कमीमतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी एस्. टी. बसवर जागृतीची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मात्र, शासकीय योजनांचे पोस्टर्सच्या प्रमाणात ही पोस्टर्स खूपच कमी असल्याचे दिसत आहे. मोजक्याच गाड्यांवर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRatnagiriरत्नागिरी