शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चिपळूणचा पाणी विभाग ठप्प

By admin | Updated: July 16, 2017 18:17 IST

शिवसेना गटनेते शशिकांत मोदी यांचा आरोप

आॅनलाईन लोकमतचिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : चिपळूण नगर परिषदेच्या पाणी विभागाचा कारभार पूर्णत: ठप्प झाला असून, या विभागाला मुख्याधिकाऱ्यांच्या कृपेमुळे कोणीही वाली उरलेला नाही. यामुळे शहरातील पाणी नियोजन ठप्प झाले असून, नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक ऐन पावसाळ्यात पाण्याविना हैराण झाल्याचा आरोप शिवसेना गटनेते शशिकांत मोदी यांनी केला आहे. चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून पाच हजारपेक्षा अधिक घरांना व आस्थापनांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेले दोन महिने शहरातील गोवळकोट, पेठमाप, मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, ओझरवाडी, पाग या भागातील नागरिकांना अत्यंत कमीदाबाने पाणी पुरवठा होत आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागाकडील कामगारांना पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे काम न देता दुसरेच काम देऊन शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत व्यत्यय आणला जात आहे. त्यातच मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळेही पाणी व्यवस्था कोलमडली आहे. यामध्ये सुधारणा होण्यासाठी शिवसेनेतर्फे आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आठ दिवसात पाणी व्यवस्थापन सुनियोजित न झाल्यास संतप्त नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडण्यात येणार आहे. याबाबत नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व पाणी सभापती वर्षा जागुष्टे यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कामकाज करणे अवघड होत असल्याचा आरोपही गटनेते मोदी यांनी केला आहे.