शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

चिपळूणचा पाणी विभाग ठप्प

By admin | Updated: July 16, 2017 18:17 IST

शिवसेना गटनेते शशिकांत मोदी यांचा आरोप

आॅनलाईन लोकमतचिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : चिपळूण नगर परिषदेच्या पाणी विभागाचा कारभार पूर्णत: ठप्प झाला असून, या विभागाला मुख्याधिकाऱ्यांच्या कृपेमुळे कोणीही वाली उरलेला नाही. यामुळे शहरातील पाणी नियोजन ठप्प झाले असून, नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक ऐन पावसाळ्यात पाण्याविना हैराण झाल्याचा आरोप शिवसेना गटनेते शशिकांत मोदी यांनी केला आहे. चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून पाच हजारपेक्षा अधिक घरांना व आस्थापनांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेले दोन महिने शहरातील गोवळकोट, पेठमाप, मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, ओझरवाडी, पाग या भागातील नागरिकांना अत्यंत कमीदाबाने पाणी पुरवठा होत आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागाकडील कामगारांना पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे काम न देता दुसरेच काम देऊन शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत व्यत्यय आणला जात आहे. त्यातच मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमुळेही पाणी व्यवस्था कोलमडली आहे. यामध्ये सुधारणा होण्यासाठी शिवसेनेतर्फे आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आठ दिवसात पाणी व्यवस्थापन सुनियोजित न झाल्यास संतप्त नागरिकांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडण्यात येणार आहे. याबाबत नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व पाणी सभापती वर्षा जागुष्टे यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कामकाज करणे अवघड होत असल्याचा आरोपही गटनेते मोदी यांनी केला आहे.