शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

कुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 12:46 PM

bridge Konkan Ratnagiri- देवरुख तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला असून, त्यावरील वाहतूक लगेचच बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकुंभारखाणीतील पुलाचा पिलर खचला, पूल धोकादायकसर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणी

देवरुख : तालुक्यातील आरवली ते राजिवली येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ४४ वरील कुंभारखाणी बु. येथील अति जुन्या पुलाच्या मधल्या पायाचा काही भाग ढासळला आहे. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसली तरी त्यामुळे पूल कमवकुवत झाला असून, त्यावरील वाहतूक लगेचच बंद करण्यात आली आहे.५० च्या दशकातील या पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. हे काम कडवई येथील ठेकेदारामार्फत केले जात आहे. मागील एक महिन्यापासून पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाहणी करण्यात येत होती. मात्र, मंगळवारी (दि. २) सकाळी येडगेवाडी -चिपळूण व येडगेवाडी-माखजन या वस्तीच्या दोन बस या पुलावरून गेल्यानंतर पुलाच्या मधल्या पायाचा भाग ढासळल्याचे दिसून आले.सध्या या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली असून, तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक वळविण्यात आली आहे. सकाळी ही घटना निदर्शनास येताच कुंभारखाणीचे पोलीस पाटील यांनी तहसीलदार सुहास थोरात व संगमेश्वर पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदयकुमार झावरे यांना ही माहिती दिली. तहसीलदार यांनी याबाबत माहिती घेण्यासाठी तातडीने तलाठी यांना घटनास्थळी रवाना केले. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी संगमेश्वर पोलीस स्थानकाचे कडवई बीट अंमलदार राजेंद्र जाधव व स्वप्निल जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले.पूल ढासळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख उपविभागीय अभियंता पूजा इंगवले व शाखा अभियंता प्रमोद भारती यांनी ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. या पुलाची दुरुस्तीऐवजी नव्या पुलाची मागणी स्थानिकांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता विकास देसाई, अक्षय बोरसे, ईश्वर बामणे, दिलीप सुर्वे, राकेश सुर्वे, विनायक सुर्वे, सुनील सुर्वे, सिध्दांत येडगे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व पूल तपासाआरवली ते राजिवली येडगेवाडी या मार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणीही केली. त्यानुसार उपविभागीय अभियंता इंगवले, प्रमोद भारती यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत कुंभारखाणी ते कुचांबे दरम्यानच्या पुलांची पाहणी केली. आवश्यक असलेल्या मोऱ्या पावसाळ्यापूर्वी बांधून देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरी