शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

लोणचं अन् मुरांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:11 IST

जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.

मनोज मुळयेमन्या : काय भाऊ, कसं वाटतंय आता?बन्या : काय राव. आधीच खूप टेन्शन आलंय. वाटलं होतं काय आणि झालंय काय, हेच समजत नाहीये. त्यात जखमेवर मीठ चोळताय का?मन्या : आता आमचे दिवस आलेत. कोकण हा आमचाच बालेकिल्ला होता आणि आमचाच बालेकिल्ला आहे. बाकी कोणीही फक्त आपणच कोकणचे नेते असल्याचा आव आणू नये.बन्या : हे मात्र चुकीचं बोलताय हा. आमच्या नेत्यानेच कोकणाचं रूप बदललंय. त्यांनी लावलेल्या झाडाची फळंच खाताय तुम्ही.मन्या : त्यांनी झाड लावलं आणि वाढवलं. हे मान्य आहे. पण नंतर काय केलं? तेच झाड तोडून टाकायचा प्रयत्न केला ना. फांद्या छाटून टाकल्या. आता कोकणातल्या लोकांनीच त्या झाडाला पाणी घालून ते झाड परत टवटवीत केलंय.बन्या : सगळा कोकण प्रांत तुमचा बालेकिल्ला ना? मग त्या उत्तरेकडच्या परगण्यात काय झालं? तिथले सरदार माघारी का गेले? तिथे तुमचा किल्ला ढासळलाच ना?मन्या : आता विषय उत्तरेकडे नेऊ नका. तिकडे शेकापमुळे तटबंदी मजबूत झाली. दक्षिण कोकणचं आधी बोला. निवडणुका सुरू झाल्यापासून मारे खूप हवा केली होतीत. हा फोडला. तो फोडला. हा आमच्या बाजूने आला. तो आमच्या बाजूने आला. बरीच हवा केलीत ना भाऊ? कुठे गेली ती? विरली?बन्या : हवा सगळेच करतात. रत्नांग्रीत म्हणे तुम्ही एक लाखाचे मताधिक्य घेणार होतात. लाखाचे खाक झालेच ना. प्रचार सुरू असताना अशी हवा करावीच लागते. पण एक खरं आहे राव. फसलोच आम्ही. अहो आमच्या सिंधुुर्गात फसलो आम्ही. मग रत्नांग्रीचे काय घेऊन बसलात? लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. या लोकांना खऱ्या-खोट्याची ओळखच नाही. आम्ही या लोकांसाठी आता काहीच करणार नाही. पण त्याची कोणाला फिकीर आहे का? आता आमचं ठरलंय नो विकास... निवडणुकीत सगळंच होतं भकास.मन्या : हे काय ‘आठवले’ मध्येच तुम्हाला? अहो विकास केला तेव्हा पद दिलेच तुम्हाला लोकांनी. पण भाकरी परतावी लागतेच. लोकांना तुमच्या जागा दिसतात, ऐश्वर्य दिसतं. लोकांना वाटतं की तुम्ही हे सगळे राजकारणातून कमावलंय. मग लोक बिथरतात. त्यामुळे भाकरी परतावी लागतेच. उत्तर कोकणात भाकरी परतली गेलीच. आणि तुम्हाला एक बोली भाषेतील म्हण माहिती आहे का? चहापेक्षा किटली गरम. म्हणजे आसपासची माणसेच जास्त आक्रमक आहेत. सर्वसामान्य लोकांना चहाच्या आधी किटलीच बघायला मिळते. या किटलीला जनता विटली आहे आता.बन्या : बरोबर असेल तुमचं. अनेक लोक आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. ही आसपासची माणसं नेत्यांच्या कानात काय-काय बोलतात आणि त्यातून सर्वसामान्य माणूस आमच्या नेत्यांपासून दुरावतो. आता याला करणार तरी काय?मन्या : यावर एकच करायला हवंय. जनतेला गृहीत धरू नका. तुम्ही खूप केलंय. पण दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना दिलासा मिळेल, असे काम व्हायलाच हवे. आमचा नेता आपल्या कार्यकर्त्यांमुळे तळागाळात पोहोचलाय. लोकांची सुखदु:ख समजून घेत तो मतदारांशी नम्रपणे वागतो. जाहीर भाषणे करताना कुणाची किती लग्न झालीत, कुणाच्या घरात काय चाललंय यावर बोलतच नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत konkanकोकण