शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोणचं अन् मुरांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:11 IST

जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.

मनोज मुळयेमन्या : काय भाऊ, कसं वाटतंय आता?बन्या : काय राव. आधीच खूप टेन्शन आलंय. वाटलं होतं काय आणि झालंय काय, हेच समजत नाहीये. त्यात जखमेवर मीठ चोळताय का?मन्या : आता आमचे दिवस आलेत. कोकण हा आमचाच बालेकिल्ला होता आणि आमचाच बालेकिल्ला आहे. बाकी कोणीही फक्त आपणच कोकणचे नेते असल्याचा आव आणू नये.बन्या : हे मात्र चुकीचं बोलताय हा. आमच्या नेत्यानेच कोकणाचं रूप बदललंय. त्यांनी लावलेल्या झाडाची फळंच खाताय तुम्ही.मन्या : त्यांनी झाड लावलं आणि वाढवलं. हे मान्य आहे. पण नंतर काय केलं? तेच झाड तोडून टाकायचा प्रयत्न केला ना. फांद्या छाटून टाकल्या. आता कोकणातल्या लोकांनीच त्या झाडाला पाणी घालून ते झाड परत टवटवीत केलंय.बन्या : सगळा कोकण प्रांत तुमचा बालेकिल्ला ना? मग त्या उत्तरेकडच्या परगण्यात काय झालं? तिथले सरदार माघारी का गेले? तिथे तुमचा किल्ला ढासळलाच ना?मन्या : आता विषय उत्तरेकडे नेऊ नका. तिकडे शेकापमुळे तटबंदी मजबूत झाली. दक्षिण कोकणचं आधी बोला. निवडणुका सुरू झाल्यापासून मारे खूप हवा केली होतीत. हा फोडला. तो फोडला. हा आमच्या बाजूने आला. तो आमच्या बाजूने आला. बरीच हवा केलीत ना भाऊ? कुठे गेली ती? विरली?बन्या : हवा सगळेच करतात. रत्नांग्रीत म्हणे तुम्ही एक लाखाचे मताधिक्य घेणार होतात. लाखाचे खाक झालेच ना. प्रचार सुरू असताना अशी हवा करावीच लागते. पण एक खरं आहे राव. फसलोच आम्ही. अहो आमच्या सिंधुुर्गात फसलो आम्ही. मग रत्नांग्रीचे काय घेऊन बसलात? लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. या लोकांना खऱ्या-खोट्याची ओळखच नाही. आम्ही या लोकांसाठी आता काहीच करणार नाही. पण त्याची कोणाला फिकीर आहे का? आता आमचं ठरलंय नो विकास... निवडणुकीत सगळंच होतं भकास.मन्या : हे काय ‘आठवले’ मध्येच तुम्हाला? अहो विकास केला तेव्हा पद दिलेच तुम्हाला लोकांनी. पण भाकरी परतावी लागतेच. लोकांना तुमच्या जागा दिसतात, ऐश्वर्य दिसतं. लोकांना वाटतं की तुम्ही हे सगळे राजकारणातून कमावलंय. मग लोक बिथरतात. त्यामुळे भाकरी परतावी लागतेच. उत्तर कोकणात भाकरी परतली गेलीच. आणि तुम्हाला एक बोली भाषेतील म्हण माहिती आहे का? चहापेक्षा किटली गरम. म्हणजे आसपासची माणसेच जास्त आक्रमक आहेत. सर्वसामान्य लोकांना चहाच्या आधी किटलीच बघायला मिळते. या किटलीला जनता विटली आहे आता.बन्या : बरोबर असेल तुमचं. अनेक लोक आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. ही आसपासची माणसं नेत्यांच्या कानात काय-काय बोलतात आणि त्यातून सर्वसामान्य माणूस आमच्या नेत्यांपासून दुरावतो. आता याला करणार तरी काय?मन्या : यावर एकच करायला हवंय. जनतेला गृहीत धरू नका. तुम्ही खूप केलंय. पण दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना दिलासा मिळेल, असे काम व्हायलाच हवे. आमचा नेता आपल्या कार्यकर्त्यांमुळे तळागाळात पोहोचलाय. लोकांची सुखदु:ख समजून घेत तो मतदारांशी नम्रपणे वागतो. जाहीर भाषणे करताना कुणाची किती लग्न झालीत, कुणाच्या घरात काय चाललंय यावर बोलतच नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत konkanकोकण