शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

लोणचं अन् मुरांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:11 IST

जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.

मनोज मुळयेमन्या : काय भाऊ, कसं वाटतंय आता?बन्या : काय राव. आधीच खूप टेन्शन आलंय. वाटलं होतं काय आणि झालंय काय, हेच समजत नाहीये. त्यात जखमेवर मीठ चोळताय का?मन्या : आता आमचे दिवस आलेत. कोकण हा आमचाच बालेकिल्ला होता आणि आमचाच बालेकिल्ला आहे. बाकी कोणीही फक्त आपणच कोकणचे नेते असल्याचा आव आणू नये.बन्या : हे मात्र चुकीचं बोलताय हा. आमच्या नेत्यानेच कोकणाचं रूप बदललंय. त्यांनी लावलेल्या झाडाची फळंच खाताय तुम्ही.मन्या : त्यांनी झाड लावलं आणि वाढवलं. हे मान्य आहे. पण नंतर काय केलं? तेच झाड तोडून टाकायचा प्रयत्न केला ना. फांद्या छाटून टाकल्या. आता कोकणातल्या लोकांनीच त्या झाडाला पाणी घालून ते झाड परत टवटवीत केलंय.बन्या : सगळा कोकण प्रांत तुमचा बालेकिल्ला ना? मग त्या उत्तरेकडच्या परगण्यात काय झालं? तिथले सरदार माघारी का गेले? तिथे तुमचा किल्ला ढासळलाच ना?मन्या : आता विषय उत्तरेकडे नेऊ नका. तिकडे शेकापमुळे तटबंदी मजबूत झाली. दक्षिण कोकणचं आधी बोला. निवडणुका सुरू झाल्यापासून मारे खूप हवा केली होतीत. हा फोडला. तो फोडला. हा आमच्या बाजूने आला. तो आमच्या बाजूने आला. बरीच हवा केलीत ना भाऊ? कुठे गेली ती? विरली?बन्या : हवा सगळेच करतात. रत्नांग्रीत म्हणे तुम्ही एक लाखाचे मताधिक्य घेणार होतात. लाखाचे खाक झालेच ना. प्रचार सुरू असताना अशी हवा करावीच लागते. पण एक खरं आहे राव. फसलोच आम्ही. अहो आमच्या सिंधुुर्गात फसलो आम्ही. मग रत्नांग्रीचे काय घेऊन बसलात? लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. या लोकांना खऱ्या-खोट्याची ओळखच नाही. आम्ही या लोकांसाठी आता काहीच करणार नाही. पण त्याची कोणाला फिकीर आहे का? आता आमचं ठरलंय नो विकास... निवडणुकीत सगळंच होतं भकास.मन्या : हे काय ‘आठवले’ मध्येच तुम्हाला? अहो विकास केला तेव्हा पद दिलेच तुम्हाला लोकांनी. पण भाकरी परतावी लागतेच. लोकांना तुमच्या जागा दिसतात, ऐश्वर्य दिसतं. लोकांना वाटतं की तुम्ही हे सगळे राजकारणातून कमावलंय. मग लोक बिथरतात. त्यामुळे भाकरी परतावी लागतेच. उत्तर कोकणात भाकरी परतली गेलीच. आणि तुम्हाला एक बोली भाषेतील म्हण माहिती आहे का? चहापेक्षा किटली गरम. म्हणजे आसपासची माणसेच जास्त आक्रमक आहेत. सर्वसामान्य लोकांना चहाच्या आधी किटलीच बघायला मिळते. या किटलीला जनता विटली आहे आता.बन्या : बरोबर असेल तुमचं. अनेक लोक आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. ही आसपासची माणसं नेत्यांच्या कानात काय-काय बोलतात आणि त्यातून सर्वसामान्य माणूस आमच्या नेत्यांपासून दुरावतो. आता याला करणार तरी काय?मन्या : यावर एकच करायला हवंय. जनतेला गृहीत धरू नका. तुम्ही खूप केलंय. पण दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढत आहेत. त्यांना दिलासा मिळेल, असे काम व्हायलाच हवे. आमचा नेता आपल्या कार्यकर्त्यांमुळे तळागाळात पोहोचलाय. लोकांची सुखदु:ख समजून घेत तो मतदारांशी नम्रपणे वागतो. जाहीर भाषणे करताना कुणाची किती लग्न झालीत, कुणाच्या घरात काय चाललंय यावर बोलतच नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता तरी सावध व्हा.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत konkanकोकण