शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

पाझर तलाव काम रखडले

By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST

शिंदेआंबेरीतील प्रकार : कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील शिंदेआंबेरी येथे पाझर तलावाच्या कामाला २००९ साली मंजुरी देण्यात आली आणि कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, ५ वर्ष होऊन गेली तरी या पाझर तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात या पाझर तलावाला खराब कामामुळे अनेक ठिकाणी भगदाडे पडली होती. त्यानंतर या तलावातील पाणी सोडून देण्यात आले होते. आता पुन्हा हे सर्व बांधकाम तोडून नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या पाझर तलावाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २००९ साली संगमेश्वर तालुक्यातील खडीओझरे, मेघी गावकरवाडी, देवरुख परशुरामवाडी, तांबेडी, शिंदेआंबेरी, अंत्रवली अशा ६ पाझर तलावांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग रत्नागिरी यांनी निविदा प्रसिद्ध करुन या कामाचा ठेका दिला. मात्र, या निविदा प्रसिद्ध करताना त्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिध्द करणे गरजेचे होते. मात्र, या निविदांची प्रसिध्दी रायगड जिल्ह्यातील वर्तमान पत्रातून करण्यात आल्याचे समोर येत आहे.लघुपाटबंधारे रत्नागिरीच्या कार्यक्षेत्रातील शिंदे आंबेरी पाझर तलावाच्या योजनेस ४८ लाख ८३ हजार ६४३ रुपये रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ९ फेब्रुवारी २००९ च्या आदेशानुसार ३६ लाख ५२६ हजार ९५२ रुपये इतक्या रक्कमेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ३३ हेक्टर इतकी आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होवून हे काम अमृता कन्स्ट्रक्शन कंपनी खेड यांना देण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी निश्चित झाला. ६ नोव्हेंबर २००९ रोजी कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र, ५ वर्षे पूर्ण होत आली तरीही हे काम अपूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.ठेकेदाराला कामाचे २९ लाखाचे बिलही अदा करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे या कामाला उशीर झाला असल्याचे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामस्थांकडून अशा कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्यावर्षी पावसाळ्यात या पाझर तलावाच्या भिंतीचे जवळजवळ १०२ मीटर उंचीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, ८२ मीटर उंचीवर या भिंतीच्या भागाला सरळ रेषेत मोठमोठी भगदाडे पडून गळती लागली होती. त्यावेळी संबंधित यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली होती. तलावही तुडुंब भरला होता. त्यामुळे गळती थांबवणे कठीण बनले होते. अखेर सांडव्याजवळ ब्लास्टिंग करुन तलावातील पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहे. सध्या ८२ मीटरवरील सर्व भराव काढून टाकून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या गळतीमुळे तलावाचा बराचसा भाग घसरुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गंभीर प्रकाराची दखल पाटबंधारे विभागाने घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)संथगतीचा कारभारएकीकडे पाणीटंचाई हा विषय चर्चेचा ठरत असताना पाण्याच्या स्रोतासाठी शासनाने तयार केलेली बांधकामेच किती कुचकामी आहेत, हे शिंदे आंबेरी येथील पाझर तलावाच्या कामावरून दिसून येते. या तलावाची निकृष्ट कामामुळे पडझड झाली. त्यामुळे आता नव्याने काम सुरू झाले आहे.