शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
4
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
5
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
6
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
7
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
8
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
9
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
10
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
11
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
12
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
13
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
14
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
15
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
16
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
17
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
18
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
19
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
20
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे

पाझर तलाव काम रखडले

By admin | Updated: April 2, 2015 00:46 IST

शिंदेआंबेरीतील प्रकार : कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील शिंदेआंबेरी येथे पाझर तलावाच्या कामाला २००९ साली मंजुरी देण्यात आली आणि कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, ५ वर्ष होऊन गेली तरी या पाझर तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात या पाझर तलावाला खराब कामामुळे अनेक ठिकाणी भगदाडे पडली होती. त्यानंतर या तलावातील पाणी सोडून देण्यात आले होते. आता पुन्हा हे सर्व बांधकाम तोडून नवीन बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या पाझर तलावाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २००९ साली संगमेश्वर तालुक्यातील खडीओझरे, मेघी गावकरवाडी, देवरुख परशुरामवाडी, तांबेडी, शिंदेआंबेरी, अंत्रवली अशा ६ पाझर तलावांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग रत्नागिरी यांनी निविदा प्रसिद्ध करुन या कामाचा ठेका दिला. मात्र, या निविदा प्रसिद्ध करताना त्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिध्द करणे गरजेचे होते. मात्र, या निविदांची प्रसिध्दी रायगड जिल्ह्यातील वर्तमान पत्रातून करण्यात आल्याचे समोर येत आहे.लघुपाटबंधारे रत्नागिरीच्या कार्यक्षेत्रातील शिंदे आंबेरी पाझर तलावाच्या योजनेस ४८ लाख ८३ हजार ६४३ रुपये रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ९ फेब्रुवारी २००९ च्या आदेशानुसार ३६ लाख ५२६ हजार ९५२ रुपये इतक्या रक्कमेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. या योजनेची सिंचन क्षमता ३३ हेक्टर इतकी आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होवून हे काम अमृता कन्स्ट्रक्शन कंपनी खेड यांना देण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी निश्चित झाला. ६ नोव्हेंबर २००९ रोजी कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र, ५ वर्षे पूर्ण होत आली तरीही हे काम अपूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.ठेकेदाराला कामाचे २९ लाखाचे बिलही अदा करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे या कामाला उशीर झाला असल्याचे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामस्थांकडून अशा कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्यावर्षी पावसाळ्यात या पाझर तलावाच्या भिंतीचे जवळजवळ १०२ मीटर उंचीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, ८२ मीटर उंचीवर या भिंतीच्या भागाला सरळ रेषेत मोठमोठी भगदाडे पडून गळती लागली होती. त्यावेळी संबंधित यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली होती. तलावही तुडुंब भरला होता. त्यामुळे गळती थांबवणे कठीण बनले होते. अखेर सांडव्याजवळ ब्लास्टिंग करुन तलावातील पाणी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहे. सध्या ८२ मीटरवरील सर्व भराव काढून टाकून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या गळतीमुळे तलावाचा बराचसा भाग घसरुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गंभीर प्रकाराची दखल पाटबंधारे विभागाने घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)संथगतीचा कारभारएकीकडे पाणीटंचाई हा विषय चर्चेचा ठरत असताना पाण्याच्या स्रोतासाठी शासनाने तयार केलेली बांधकामेच किती कुचकामी आहेत, हे शिंदे आंबेरी येथील पाझर तलावाच्या कामावरून दिसून येते. या तलावाची निकृष्ट कामामुळे पडझड झाली. त्यामुळे आता नव्याने काम सुरू झाले आहे.