शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

लस न मिळाल्याने रत्नागिरीत लोकांचा गोंधळच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कमी डोस आणि प्रचंड गर्दी यामुळे रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील रसीकरण केंद्रावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. ...

रत्नागिरी : कमी डोस आणि प्रचंड गर्दी यामुळे रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील रसीकरण केंद्रावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. जोरदार ढकलाढकली झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. जवळपास चारशे लोक येथे जमले हाेते आणि त्यातील २२० लोकांना लस मिळाल्याने हा गोंधळ झाला.

रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्र मिस्त्री हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती जाहीर झाली होती. हा डोस दुपारी दिला जाणार होता. सकाळच्या सत्रात कोविशिल्डचा डोस दिला जाणार होता. दुपारची वेळ देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकही सकाळपासूनच रांग लावून उभे होते. ज्यावेळी सकाळच्या सत्रात अपाॅइंटमेंट दिलेले लोक येऊ लागले. तेव्हापासूनच बारीकसारीक वाद सुरू झाले होते. दुपारी २नंतर गर्दी वाढली आणि तेव्हा मात्र जवळजवळ धक्काबुक्कीच झाली. त्यावेळी प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे लोक अधिकच संतापले.

उपलब्ध डोसच्या दुप्पट लोक या लसीकरण केंद्राबाहेर जमले होते. त्यामुळे खूप गोंधळ झाला. लोक आक्रमक झालेले पाहून लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अखेर पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

लोक ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी दुपार सत्रातील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना घरी जायला सांगितले. हे नागरिक ऐकायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.

ज्यांचा दुसरा डोस होता अशांनी व त्यांच्या नातेवाइकांनीही केंद्रावर गर्दी केली होती. या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे डोसचे प्रमाण कमी होते व नागरिक अधिक होते व त्यामुळे तणाव निर्माण झाला. म्हणून पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक बोलावले. तरीही नागरिकांमध्ये काही फरक पडला नाही.

डोस कमी असल्यामुळे अखेर आरोग्य पथकाने कूपन देण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे नागरिकांना हा निर्णय समजल्यावर त्यांनी गदारोळ करायला सुरूवात केली.

नागरिक शांत होत नसल्याने आरोग्य विभागाने पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली. गेटबाहेर असलेल्यांना कूपन देऊन आत पाठविले जाऊ लागले. आत गेल्यावरही नागरिकांची भूमिका सहकार्याची नव्हती. जितके डोस होते, तेवढी कूपन दिल्यानंतर उर्वरित लाेकांना घरी पाठविण्यात आले. त्यालाही लोक तयार नव्हते. मात्र डोसच नसल्याने अखेर लोक परतले. मात्र तोवर पोलीस यंत्रणेवर चांगलाच ताण आला.