शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

लस न मिळाल्याने रत्नागिरीत लोकांचा गोंधळच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कमी डोस आणि प्रचंड गर्दी यामुळे रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील रसीकरण केंद्रावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. ...

रत्नागिरी : कमी डोस आणि प्रचंड गर्दी यामुळे रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील रसीकरण केंद्रावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. जोरदार ढकलाढकली झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. जवळपास चारशे लोक येथे जमले हाेते आणि त्यातील २२० लोकांना लस मिळाल्याने हा गोंधळ झाला.

रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्र मिस्त्री हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती जाहीर झाली होती. हा डोस दुपारी दिला जाणार होता. सकाळच्या सत्रात कोविशिल्डचा डोस दिला जाणार होता. दुपारची वेळ देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकही सकाळपासूनच रांग लावून उभे होते. ज्यावेळी सकाळच्या सत्रात अपाॅइंटमेंट दिलेले लोक येऊ लागले. तेव्हापासूनच बारीकसारीक वाद सुरू झाले होते. दुपारी २नंतर गर्दी वाढली आणि तेव्हा मात्र जवळजवळ धक्काबुक्कीच झाली. त्यावेळी प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे लोक अधिकच संतापले.

उपलब्ध डोसच्या दुप्पट लोक या लसीकरण केंद्राबाहेर जमले होते. त्यामुळे खूप गोंधळ झाला. लोक आक्रमक झालेले पाहून लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अखेर पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

लोक ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी दुपार सत्रातील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना घरी जायला सांगितले. हे नागरिक ऐकायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.

ज्यांचा दुसरा डोस होता अशांनी व त्यांच्या नातेवाइकांनीही केंद्रावर गर्दी केली होती. या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे डोसचे प्रमाण कमी होते व नागरिक अधिक होते व त्यामुळे तणाव निर्माण झाला. म्हणून पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक बोलावले. तरीही नागरिकांमध्ये काही फरक पडला नाही.

डोस कमी असल्यामुळे अखेर आरोग्य पथकाने कूपन देण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे नागरिकांना हा निर्णय समजल्यावर त्यांनी गदारोळ करायला सुरूवात केली.

नागरिक शांत होत नसल्याने आरोग्य विभागाने पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली. गेटबाहेर असलेल्यांना कूपन देऊन आत पाठविले जाऊ लागले. आत गेल्यावरही नागरिकांची भूमिका सहकार्याची नव्हती. जितके डोस होते, तेवढी कूपन दिल्यानंतर उर्वरित लाेकांना घरी पाठविण्यात आले. त्यालाही लोक तयार नव्हते. मात्र डोसच नसल्याने अखेर लोक परतले. मात्र तोवर पोलीस यंत्रणेवर चांगलाच ताण आला.