शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

प्रलंबित योजना मार्गी लागणार

By admin | Updated: October 30, 2014 00:50 IST

रत्नागिरी : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारी लोकवर्गणी शासनाने रद्द केल्याने आता

रत्नागिरी : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारी लोकवर्गणी शासनाने रद्द केल्याने आता कमी लोकसंख्या असलेल्या गावातही शासकीय योजना राबविता येणार आहेत़ अनेक प्रलंबित तसेच भविष्यात प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी शासनाकडून लोकवर्गणी गोळा करण्यात येत होती़ या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेवरील मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. लोकवर्गणी जमा होत नसल्याने अनेक गावांमध्ये योजना राबविता येत नव्हत्या़पाणी पुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने आतापर्यंत मागणीवर आधारित लोकसहभागाचे धोरण स्वीकारले होते़ त्यानुसार या योजनांसाठी खर्चाच्या १० टक्के लोकवर्गणी भरणे अनिवार्य होते़ पण, अनेक ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना लोकवर्गणी भरणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले होते़ साधारण १ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला सुमारे १० लाख रुपये लोकवर्गणी भरावी लागत होती़ ही रक्कम प्रतिकुटुंब हजारो रुपयांपर्यंत लोकवाटा जात होता. अनेक ग्रामस्थांना ही रक्कम भरणे शक्य होत नसल्याने संबंधित गाव पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहात होता़ मागील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत रखडलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना ह्या लोकवर्गणी व लोकवर्गणीशी निगडीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या प्रश्नांमुळे रखडल्या होत्या़ लोकवर्गणीच्या अटींमुळे योजना राबविण्यास विलंब होत होता़ त्यामुळे लोकवर्गणीची अट कायमस्वरुपी रद्द करावी, असा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने तयार करुन तो शासनाकडे सादर केला होता़ त्याला तत्कालीन आघाडी शासनाने मंजूरी दिली होती़ या निर्णयामुळे आता अनेक गावातील प्रलंबित योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे़ (शहर वार्ताहर)