शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

प्रलंबित योजना मार्गी लागणार

By admin | Updated: October 30, 2014 00:50 IST

रत्नागिरी : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारी लोकवर्गणी शासनाने रद्द केल्याने आता

रत्नागिरी : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लागणारी लोकवर्गणी शासनाने रद्द केल्याने आता कमी लोकसंख्या असलेल्या गावातही शासकीय योजना राबविता येणार आहेत़ अनेक प्रलंबित तसेच भविष्यात प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी शासनाकडून लोकवर्गणी गोळा करण्यात येत होती़ या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेवरील मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. लोकवर्गणी जमा होत नसल्याने अनेक गावांमध्ये योजना राबविता येत नव्हत्या़पाणी पुरवठा योजनांसाठी राज्य शासनाने आतापर्यंत मागणीवर आधारित लोकसहभागाचे धोरण स्वीकारले होते़ त्यानुसार या योजनांसाठी खर्चाच्या १० टक्के लोकवर्गणी भरणे अनिवार्य होते़ पण, अनेक ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना लोकवर्गणी भरणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले होते़ साधारण १ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला सुमारे १० लाख रुपये लोकवर्गणी भरावी लागत होती़ ही रक्कम प्रतिकुटुंब हजारो रुपयांपर्यंत लोकवाटा जात होता. अनेक ग्रामस्थांना ही रक्कम भरणे शक्य होत नसल्याने संबंधित गाव पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहात होता़ मागील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत रखडलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना ह्या लोकवर्गणी व लोकवर्गणीशी निगडीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या प्रश्नांमुळे रखडल्या होत्या़ लोकवर्गणीच्या अटींमुळे योजना राबविण्यास विलंब होत होता़ त्यामुळे लोकवर्गणीची अट कायमस्वरुपी रद्द करावी, असा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने तयार करुन तो शासनाकडे सादर केला होता़ त्याला तत्कालीन आघाडी शासनाने मंजूरी दिली होती़ या निर्णयामुळे आता अनेक गावातील प्रलंबित योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे़ (शहर वार्ताहर)