शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

वातावरणापुढे शेतकऱ्यांनी टेकले गुडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:25 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार झाले होते. हवामान खात्याने वादळी वारे व पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्माेहोर, थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. मार्चपासून किरकोळ आंबा बाजारात येथे सुरू झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक निम्यापेक्षा कमी आहे. आंब्याला दरही नसल्याने शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस रत्नागिरीचे कमाल तापमान सुमारे ३४ अंश असले तरी शनिवारी सायंकाळी आभाळ दाटून आले होते. रविवारी पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार झाले होते. मात्र दुपारनंतर हे वातावरण थोडेफार निवळले.सध्या वाशी मार्केटमध्ये ८०० ते २००० रूपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला, तरी खर्च जावून शेतकºयांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच कँनिंग व्यवसाय सुरू झाला असून, आंबा किलोवर खरेदी केला जात आहे. कॅनिंगसाठी २५ रूपये किलो दराने आंबा खरेदी करण्यात येत आहे. शनिवारी कोकणातून ७५ हजार व अन्य राज्यांतून २५ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये आल्या होत्या. बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा पिकाला बसल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आहे. उत्पादन कमी असतानाच दरही घसरले आहेत. गत दहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्म्यावर झाली आहे.पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसºया टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसºया टप्प्यातील आंबा थ्रीप्सने ओरखडल्यामुळे त्याचे बाजारात येण्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकºयांना किलोवर द्यावा लागणार आहे. मात्र, किलोचेही दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.