शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

वातावरणापुढे शेतकऱ्यांनी टेकले गुडघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:25 IST

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार ...

रत्नागिरी : वाढत्या तापमानामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले असताना अचानक हवामानात बदल झाल्याने रविवारी सकाळी पावसाळा सदृश्य वातावरण तयार झाले होते. हवामान खात्याने वादळी वारे व पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यावर्षीचा आंबा हंगाम आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. पुनर्माेहोर, थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंबा पीक धोक्यात आले आहे. मार्चपासून किरकोळ आंबा बाजारात येथे सुरू झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक निम्यापेक्षा कमी आहे. आंब्याला दरही नसल्याने शेतकऱ्यांना खत व्यवस्थापनापासून आंबा काढणीपर्यंत होणारा खर्च निघणे अवघड झाले आहे. गेले दोन दिवस रत्नागिरीचे कमाल तापमान सुमारे ३४ अंश असले तरी शनिवारी सायंकाळी आभाळ दाटून आले होते. रविवारी पाऊस केव्हाही कोसळू शकतो, असे वातावरण तयार झाले होते. मात्र दुपारनंतर हे वातावरण थोडेफार निवळले.सध्या वाशी मार्केटमध्ये ८०० ते २००० रूपयांपर्यंत पेटीला दर देण्यात येत असला, तरी खर्च जावून शेतकºयांच्या हाती काहीच येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच कँनिंग व्यवसाय सुरू झाला असून, आंबा किलोवर खरेदी केला जात आहे. कॅनिंगसाठी २५ रूपये किलो दराने आंबा खरेदी करण्यात येत आहे. शनिवारी कोकणातून ७५ हजार व अन्य राज्यांतून २५ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी मार्केटमध्ये आल्या होत्या. बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील आंबा पिकाला बसल्याने उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. कोकणातील आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आहे. उत्पादन कमी असतानाच दरही घसरले आहेत. गत दहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी पहिल्यांदाच हापूसची आवक निम्म्यावर झाली आहे.पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसºया टप्प्यातील आंबा किरकोळ आहे. तिसºया टप्प्यातील आंबा थ्रीप्सने ओरखडल्यामुळे त्याचे बाजारात येण्याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. त्यामुळे हा आंबा शेतकºयांना किलोवर द्यावा लागणार आहे. मात्र, किलोचेही दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.