शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचे काम संथ गतीने!

By admin | Updated: June 29, 2016 23:59 IST

संगमेश्वर तालुका : तळागाळातील शेतकरी अनभिज्ञच

देवरूख : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार बँकांमार्फत पीक कर्ज वितरीत केले जात आहे. शेतकऱ्यांची उदासीनता, शासकीय कर्मचाऱ्यांकडून तळागाळातील शेतकऱ्यांना याची सविस्तर माहिती न मिळणे यामुळे योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. ७३ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी केवळ २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी आजपर्यंत या योजनेचा फायदा उठवला आहे. तालुक्यात कर्ज वाटपाचे काम ३०.८२ टक्के एवढेच झाले आहे. कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकत पीक कर्ज वाटपाची योजना राबवण्याचा निर्णय घेत कामकाजाला प्रत्यक्षात प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी कोणतीही आर्थिक टंचाई भासू नये, या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.राष्ट्रीयीकृत बँका, सोसायट्या यांच्यामार्फत पीककर्ज वाटपासाठी अर्ज वितरीत करण्यात येत आहेत. संगमेश्वर तालुक्यात ७३ हजार १३९ शेतकरी या योजनेसाठी योग्य आहेत. यातील २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी परिपूर्ण अर्ज लिहून सादर केले आहेत. या योजनेचे ३०.८२ टक्के कामपूर्ण झाले आहे. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून, ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा व्यवसाय आहे. पीककर्ज वाटप योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्जापोटी असलेली भीती मुख्य कारण आहे. याचसाठी शेतकरी कर्ज घेण्यासाठी धजावत नाहीत. तालुक्यातील पीक कर्ज घेण्यास योग्य असलेले सुमारे ५० हजार शेतकरी वंचित आहेत. पीक कर्ज योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली माने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची पाठ : जनजागृतीच नाही...शासकीय कर्मचाऱ्यांकडून म्हणाव्या त्या प्रमाणात जनजागृती केली जात नसल्याने तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचतच नाही. त्यामुळे गरिबी असल्याने केवळ पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात कर्जवाटप कमी झाले आहे.