शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

पीककर्जाचे काम संथ गतीने!

By admin | Updated: June 29, 2016 23:59 IST

संगमेश्वर तालुका : तळागाळातील शेतकरी अनभिज्ञच

देवरूख : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार बँकांमार्फत पीक कर्ज वितरीत केले जात आहे. शेतकऱ्यांची उदासीनता, शासकीय कर्मचाऱ्यांकडून तळागाळातील शेतकऱ्यांना याची सविस्तर माहिती न मिळणे यामुळे योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. ७३ हजार १३९ शेतकऱ्यांपैकी केवळ २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी आजपर्यंत या योजनेचा फायदा उठवला आहे. तालुक्यात कर्ज वाटपाचे काम ३०.८२ टक्के एवढेच झाले आहे. कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकत पीक कर्ज वाटपाची योजना राबवण्याचा निर्णय घेत कामकाजाला प्रत्यक्षात प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी कोणतीही आर्थिक टंचाई भासू नये, या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.राष्ट्रीयीकृत बँका, सोसायट्या यांच्यामार्फत पीककर्ज वाटपासाठी अर्ज वितरीत करण्यात येत आहेत. संगमेश्वर तालुक्यात ७३ हजार १३९ शेतकरी या योजनेसाठी योग्य आहेत. यातील २२ हजार ५४५ शेतकऱ्यांनी परिपूर्ण अर्ज लिहून सादर केले आहेत. या योजनेचे ३०.८२ टक्के कामपूर्ण झाले आहे. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून, ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा व्यवसाय आहे. पीककर्ज वाटप योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड ग्रामीण भागातून होत आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्जापोटी असलेली भीती मुख्य कारण आहे. याचसाठी शेतकरी कर्ज घेण्यासाठी धजावत नाहीत. तालुक्यातील पीक कर्ज घेण्यास योग्य असलेले सुमारे ५० हजार शेतकरी वंचित आहेत. पीक कर्ज योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली माने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची पाठ : जनजागृतीच नाही...शासकीय कर्मचाऱ्यांकडून म्हणाव्या त्या प्रमाणात जनजागृती केली जात नसल्याने तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचतच नाही. त्यामुळे गरिबी असल्याने केवळ पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात कर्जवाटप कमी झाले आहे.