शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

रत्नागिरी रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जाताे, हा आनंद देणारा क्षण - डाॅ. भास्कर जगताप

By शोभना कांबळे | Updated: February 7, 2024 18:20 IST

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली.

रत्नागिरी : रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जातो हे आपल्याला समाधान आणि आनंद देणारा क्षण असतो. हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, अशा भावना रत्नागिरीचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. भास्कर जगताप यांनी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केल्या.आधीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले- गावडे यांची येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या अधिक्षकपदावर बदली झाली असून त्यांच्या जागी डाॅ. भास्कर जगताप यांची बदली झाली आहे. मंगळवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, परिचारिका यांची ओळख करुन घेतली. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डाॅ. भास्कर जगताप म्हणाले की, रूग्णालयात येणारा रुग्ण हा गरिब घरातून आलेला असतो. त्याच्या खिशात पैसे नसतात. जिल्हास्तरावरील रुग्णालयात आल्यामुळे तो घाबरलेला असतो. अशा वेळी त्या रुग्णाला आपण धीर देत उपचार केले पाहिजे. त्याला बरे करुन सुखरुप घरी पाठविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण रुग्णांसाठी आहोत याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवले पाहिजे. आपल्याला रुग्ण वाचवायचा असतो, जबाबदारी झटकून चालणार नाही, अशी सक्त सुचनाही त्यांनी दिली. परिचारिकांची संख्या अपूरी आहे. याची माहिती मी घेतली आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करुन कर्मचारी संख्या कशी परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यत आहे त्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जास्त वेळ काम करुन रुग्णसेवा द्यावी. त्यामध्ये खंड पडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी सुचनाही डॉ. जगताप यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी