शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जाताे, हा आनंद देणारा क्षण - डाॅ. भास्कर जगताप

By शोभना कांबळे | Updated: February 7, 2024 18:20 IST

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली.

रत्नागिरी : रुग्णालयातून रुग्ण बरा होऊन जातो हे आपल्याला समाधान आणि आनंद देणारा क्षण असतो. हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, अशा भावना रत्नागिरीचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. भास्कर जगताप यांनी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केल्या.आधीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले- गावडे यांची येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या अधिक्षकपदावर बदली झाली असून त्यांच्या जागी डाॅ. भास्कर जगताप यांची बदली झाली आहे. मंगळवारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला.

पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, परिचारिका यांची ओळख करुन घेतली. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डाॅ. भास्कर जगताप म्हणाले की, रूग्णालयात येणारा रुग्ण हा गरिब घरातून आलेला असतो. त्याच्या खिशात पैसे नसतात. जिल्हास्तरावरील रुग्णालयात आल्यामुळे तो घाबरलेला असतो. अशा वेळी त्या रुग्णाला आपण धीर देत उपचार केले पाहिजे. त्याला बरे करुन सुखरुप घरी पाठविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण रुग्णांसाठी आहोत याचे भान प्रत्येक कर्मचाऱ्याने ठेवले पाहिजे. आपल्याला रुग्ण वाचवायचा असतो, जबाबदारी झटकून चालणार नाही, अशी सक्त सुचनाही त्यांनी दिली. परिचारिकांची संख्या अपूरी आहे. याची माहिती मी घेतली आहे. त्यासाठी मी पाठपुरावा करुन कर्मचारी संख्या कशी परिपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यत आहे त्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जास्त वेळ काम करुन रुग्णसेवा द्यावी. त्यामध्ये खंड पडणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी सुचनाही डॉ. जगताप यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी