शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायासाठी ‘पेशन्स’ महत्त्वाचे

By admin | Updated: May 25, 2016 00:27 IST

योगेश देवधर : दुग्धोत्पादन वाढीसाठी समाज आणि शासनही उदासीन

कोकणात दुग्धोत्पादन व्यवसाय पारंपरिक असला तरी अनेक मूलभूत समस्यांनी या व्यवसायाला ग्रासले. त्यामुळे गावांमधील बहुतांश दूध डेअऱ्या बंद झाल्या आहेत. अनेक दूध उत्पादक संस्थांना घरघर लागली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही खासगी उत्पादकांनाही नाइलाजाने आपले व्यवसाय बंद करावे लागले. सध्या जिल्ह्याबाहेरील ‘ब्रँडेड’ कंपन्यांच्या दूध पिशव्यांनी जिल्ह्यात चांगलेच बस्तान बसविले आहे. मात्र, अशा परिस्थितीत या मूळ सिंधुदुर्ग येथील पण आता रत्नागिरीनजीकच्या भोके येथे वास्तव्यास असलेले तरूण उद्योजक योगेश देवधर यांनी मार्च २०१६पासून रत्नागिरी आणि परिसरात ‘देवधर डेअरी फार्म’ या ब्रँडखाली दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादने यांचे अधिकृत वितरण करण्यास प्रारंभ केला आहे. याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्न : या क्षेत्रात कसे आलात ?उत्तर : मी मूळचा शेरपे (सिंधुदुर्ग) येथील. घरची शेती वगैरे होती. त्यामुळे या व्यवसायाची आवड होतीच. रत्नागिरीत व्यवसायानिमित्त आलो आणि प्रिंटर दुरूस्ती, टोनर, काट्रेज रिफिलिंग सुरू केले. काही वर्षांनंतर भोके (ता. रत्नागिरी) येथे माझ्या मित्राने जागा विकायला काढली. त्यावेळी त्याने मला विचारले आणि २००५ साली मी ती विकतही घेतली. मात्र, त्यावेळी या व्यवसायाबाबत तसं काही डोक्यात नव्हतंच.प्रश्न : व्यवसायाची सुरूवात कशी केली ?उत्तर : २००८ साली मी या जागेत घर बांधलं आणि मग आपण दुग्धोत्पादन व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. दोन - तीन म्हशी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. पण, दुधाचे प्रमाण आणि त्यासाठी होणारा खर्च याचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे मग म्हशी घेऊन व्यवसाय वाढविण्याचे ठरवले. २०१३ साली १० म्हशी घेऊन गोठा बांधला आणि मग पहिल्यांदाच जाकादेवी, खंडाळा, निवळी, हातखंबा आदी भागात दूध वितरीत करण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय करताना लक्षात आले की, जिल्ह्यात बाहेरून ६० ते ६५ हजार लीटर दूध येते. तरीही पिशवीबंद दुधाची मागणी वाढतच आहे. २०१४ साली ३० म्हशींचा गोठा सुरू केला. दररोज दीडशे लीटर दूध मिळू लागले. पॅकिंग मशीन आणून अर्धा लीटरच्या दूध पिशव्यांमधून विक्री सुरू झाली. मात्र, दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी ब्रँडिगची अडचण वाटू लागली. यादृष्टीने आपले ब्रँडिंग असणे गरजेचे वाटू लागले. लोकांची सकस आणि दर्जेदार दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी हेही तितकेच आवश्यक होते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. नोव्हेंबर २०१५मध्ये म्हशीच्या दुधासाठी पाश्चराईज्ड आणि गाईच्या दुधासाठी होमोजिनाईज्ड प्रक्रिया करणारे युनिट घेतले. कोटीच्या युनिटसाठी माझ्या बँकेने मला सहकार्य केले. प्रश्न : या समस्यांवर कशी मात केली?उत्तर : मी म्हटलं तसं एखाद्या व्यवसायात पडायचं म्हटलं तर त्या व्यवसायातील बारीकसारीक मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. अडचणींचा विचार आधी करायला हवा. त्यादृष्टीने महत्त्वाची गरज होती, ती चाऱ्याची. त्यामुळे माझ्या जागेत एक एकरवर चाऱ्याची लागवड केली. पाण्याचेही योग्य नियोजन केले आहे, त्यामुळे चाराही चांगल्या प्रकारे मिळत आहे. या जनावरांच्या शेणातूनही मोठा व्यवसाय उभा राहतो, हे लक्षात घेऊन चार महिन्यांपासून शेणापासून गांडूळ खत प्रकल्प सुरू केलाय. वर्षभरात ८० टनापर्यंत खत यामुळे मिळू शकेल.प्रश्न : रत्नागिरीत या व्यवसायाची व्याप्ती कशी वाढविली ?उत्तर : दोन - तीन वर्षे मी भोके येथे ३०० लीटर दूध वितरीत करत आहे. त्यामुळे याचा सखोल अभ्यास केला होताच. माझ्या प्रिंटर दुरूस्ती व्यवसायाच्या जागेतच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि १ मार्चपासून रत्नागिरीत दूध वितरणास सुरुवात केली. सध्या ५० म्हशी आणि दहा गायी घेतल्या आहेत. सध्या ६०० लीटर दुधाचे दररोज वितरण सुरू आहे. दुधाबरोबरच आता खवा, तूप, लोणी, ताक आदी दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही सुरू केली आहे. लवकरच श्रीखंड, आम्रखंड आदी पदार्थही सुरू करण्याचा मानस आहे. हळूहळू दूध संकलन वाढविणार असून, दोन - तीन संकलन केंद्रही वाढविणार आहे. चिपळूण, देवरूख, संगमेश्वर या शहरांमध्येही वितरण सुरू करणार आहे. प्रश्न : व्यवसायासाठी शासकीय योजनेचा लाभ घेतला काय ?उत्तर : खरं सांगू, शासकीय योजनांना अर्थ नाही. केवळ पेपर रंगविले जातात, त्याचा उपयोग नाही. ज्याला खऱ्या अर्थाने गरज असते, त्याला त्या योजनेचा लाभ मिळतच नाही. शासनाकडून जी यंत्रसामग्री दिली जाते, तिचा उपयोग खऱ्या अर्थाने किती शेतकऱ्यांना होतो, हा विचार होणे महत्त्वाचे आहे. याचा अनुभव घेतल्यामुळे माझ्या व्यवसायासाठी मी शासकीय योजनेचा एकही पैसा घेतला नाही. प्रश्न : या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगाल ?उत्तर : खडतर कष्ट करावे लागतात, यामुळे या व्यवसायात नव्याने येण्यासाठी कुणी तयारी दाखवत नाही. मी अनेक बचत गटांना यासाठी सुचविलं होतं. मात्र, व्यवसाय करण्याचीच इच्छा दिसत नाही. त्याचबरोबर शासनही उदासीन आहे. या व्यवसायात लोकांनी यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, या व्यवसायातील अडचणी दूर करायला हव्यात. पण, तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच आज या पारंपरिक दुग्ध व्यवसायाला कोकणात उतरती कळा लागली आहे.प्रश्न : या व्यवसायात यश मिळण्यासाठी काय करायला हवे ?दुग्धोत्पादन व्यवसायात तुमचं पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही. येथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करणे आवश्यक असते. तुमचं व्यवसायाचं कॅलक्युलेशन चुकतं कुठं, व्यवसाय सुरू केल्यानंतर उत्पादन मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरचा खर्च लक्षात घ्यायला हवा. ओला चारा, सुकं खाद्य यांचा वाहतूक खर्च वाढतो. हा खर्च वाढला की, गणित चुकतं. म्हणूनच यासाठी पेशन्स आवश्यक असतात. सुरुवातीला काही वर्षे आपण नफ्याची अपेक्षा न करता सातत्याने परिश्रम करायला हवे. आपल्या परिश्रमांवर विश्वास हवा. एवढे केले तर काही दिवसांनी यश नक्कीच मिळू शकेल. - शोभना कांबळे