शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पासपोर्टसाठी माराव्या लागतात मुंबईत फेऱ्या

By admin | Updated: November 2, 2014 00:48 IST

खासगी कंपनीकडे सुपूर्द

रत्नागिरी : पासपोर्ट कार्यालय खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात असलेले पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलविण्यात आले आहे. परिणामी जिल्हावासियांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईत फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च येत असून खासगी एजंटदेखील पासपोर्ट काढण्यासाठी पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे.अनेकजण परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जातात. याशिवाय नातेवाईकांकडे किंवा पर्यटनासाठी जाणारी मंडळी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये जावे लागते. दरमहा हजारोंचे अर्ज पासपोर्टसाठी आहेत. परंतु जिल्ह्यात ही प्रक्रिया होत नाही. जिल्हावासियांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मुंबईत एजन्सीच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ घेऊनच मुंबईवारी करावी लागत आहे. मुळ पासपोर्टसाठी दिड हजार रुपये खर्च येतो. परंतु जाण्यायेण्यासाठी दोन हजारापर्यंतचा खर्च सोसावा लागत आहे. शिवाय लागणारा अर्ज व त्याकरिता जोडली जाणारी संंबंधित कागदपत्रे याबाबत माहिती नसल्याने त्यासाठी एजंट किंवा दलालांचा आधार घ्यावा लागतो. अर्ज भरुन देण्यासाठी दलाल दोन हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे पासपोर्ट काढण्याकरिता पाच हजारापेक्षा अधिक खर्च लोकांना येत आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी होऊन कागदपत्रे मुंबईहून रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पाठविली जातात. त्यानंतर संंबंधित व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलीस ठाण्यामध्ये होते. संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षकांचे हमीपत्र मुंबईला पाठविले जाते. त्यानंतर टपालाने पासपोर्ट घरी पाठविला जातो. एकूणच किचकट स्वरुपाची प्रक्रिया असलेल्या पासपोर्टचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यातच सुरु करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)