शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

पासपोर्टसाठी माराव्या लागतात मुंबईत फेऱ्या

By admin | Updated: November 2, 2014 00:48 IST

खासगी कंपनीकडे सुपूर्द

रत्नागिरी : पासपोर्ट कार्यालय खासगी कंपनीकडे सुपूर्द करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात असलेले पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलविण्यात आले आहे. परिणामी जिल्हावासियांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईत फेऱ्या माराव्या लागत आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च येत असून खासगी एजंटदेखील पासपोर्ट काढण्यासाठी पैसे उकळत असल्याचे निदर्शनास येत आहे.अनेकजण परदेशात शिक्षण व नोकरीसाठी जातात. याशिवाय नातेवाईकांकडे किंवा पर्यटनासाठी जाणारी मंडळी असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना मुंबईमध्ये जावे लागते. दरमहा हजारोंचे अर्ज पासपोर्टसाठी आहेत. परंतु जिल्ह्यात ही प्रक्रिया होत नाही. जिल्हावासियांना आॅनलाईन नोंदणी करावी लागते. मुंबईत एजन्सीच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ घेऊनच मुंबईवारी करावी लागत आहे. मुळ पासपोर्टसाठी दिड हजार रुपये खर्च येतो. परंतु जाण्यायेण्यासाठी दोन हजारापर्यंतचा खर्च सोसावा लागत आहे. शिवाय लागणारा अर्ज व त्याकरिता जोडली जाणारी संंबंधित कागदपत्रे याबाबत माहिती नसल्याने त्यासाठी एजंट किंवा दलालांचा आधार घ्यावा लागतो. अर्ज भरुन देण्यासाठी दलाल दोन हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे पासपोर्ट काढण्याकरिता पाच हजारापेक्षा अधिक खर्च लोकांना येत आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी होऊन कागदपत्रे मुंबईहून रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पाठविली जातात. त्यानंतर संंबंधित व्यक्तीची चारित्र्य पडताळणी पोलीस ठाण्यामध्ये होते. संबंधित पोलीस ठाण्यातील निरीक्षकांचे हमीपत्र मुंबईला पाठविले जाते. त्यानंतर टपालाने पासपोर्ट घरी पाठविला जातो. एकूणच किचकट स्वरुपाची प्रक्रिया असलेल्या पासपोर्टचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यातच सुरु करावे अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)