शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

वर्षभर बंद असणारे राजापुरातील पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

राजापूर : तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या ...

राजापूर : तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५१ नागरिकांनी पासपोर्ट कार्यालयात येऊन पासपोर्टची नोंद केली आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून व रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना सोयीस्कर ठरेल असे पासपोर्ट सेवा केंद्र राजापूर पोस्ट कार्यालयात सुरू केले होते. मागील कालावधीत दोन जिल्ह्यांतील नागरिकांनी या सेवा केंद्राच्या माध्यमातून पासपोर्ट काढले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे यापूर्वी प्रदीर्घकाळ हे सेवाकेंद्र बंद होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू झाल्यावर नागरिकांनी आपापल्या पासपोर्टची नोंद केली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे येथील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा बंद होते. गेल्या २३ जूनपासून ते पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पाच दिवसांत जवळपास ५१ नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज केले असल्याची माहिती या केंद्राकडून देण्यात आली.