शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

संगणकामुळे कळली प्रवासी संख्या

By admin | Updated: August 9, 2016 23:50 IST

प्रकाश रसाळ : अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून संवेदनशील प्रतिसाद

मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर- महाड दरम्यानचा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तुटला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या दोन्ही गाड्यांना जलसमाधी मिळाली. दोन्ही गाड्यांतील २७ प्रवासी व चालक वाहक मिळून ३१ जण बेपत्ता झाले. गाडीत एकूण किती प्रवासी होते, याची माहिती जीपीएस यंत्रामुळे मिळू शकली, असे सांगतानाच प्रभारी वाहतूक नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी या यंत्रणेबाबतची माहिती ‘लोकमत’ला दिली.प्रश्न : सावित्री नदीवरील पूल तुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतील प्रवासी संख्या कशी मिळाली ? उत्तर : मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर - महाड दरम्यानचा पूल तुटला. या दुर्घटनेत जयगड - मुंबई व राजापूर - बोरिवली या एस. टी. बसेस बेपत्ता झाल्यामुळे सुरूवातीला चालक वाहकांसह २२ प्रवासी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. राजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाड्यांच्या चालक - वाहकांची ड्युटी चिपळुणात संपल्यानंतर दुर्घटनेत सापडलेल्या चालक - वाहकांनी बसचा ताबा घेतला होता. ड्युटी संपल्यामुळे पूर्वीच्या चालकांनी हिशेब चिपळूण आगारात सादर केला होता. ईटीएम मशीनमुळे चिपळूणपर्यंतची सर्व माहिती चिपळूण आगारात प्राप्त झाली होती. मात्र, चिपळूणपासून राजापूर - बोरिवली गाडीचे वाहक टी. बी. शिर्के, चालक जी. एस. मुंडे यांनी, तर जयगड - मुंबई गाडीचे वाहक व्ही. के. देसाई, चालक एस. एस. कांबळे यांनी बसचा ताबा घेतला होता. परंतु दोन्ही गाड्यांना जलसमाधी मिळाल्यामुळे काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती. परंतु जीपीएस यंत्रणेमुळे मुंबई सेंट्रल येथील संगणकप्रणालीव्दारे माहिती मिळवण्यात आली. त्यातून चालक - वाहकांसह एकूण ३१ प्रवासी असल्याची माहिती मिळाली. ड्युटी संपलेल्या चालक - वाहकांचे महाड येथे जबाब नोंदवण्यात आले. राजापूर गाडीत १७ आणि जयगड गाडीतील १० प्रवाशांसह दोन्ही गाड्यांचे चालक - वाहक मिळून एकूण ३१ जण होते.प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात ब्रिटिशकालीन ११ पूल असून, त्याची आयुर्मर्यादा संपली आहे, सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर किती मार्गावरील वाहतूक बंद केली आहे अथवा काय सूचना दिली आहे का?उत्तर : वाहतूक बंद किंवा चालू ठेवण्याबाबत एस. टी.ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आवश्यक असते. परंतु जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन ११ पुलांची आयुर्मर्यादा संपली असली तरी संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत कोणतेही शासकीय आदेश अद्याप एस. टी. प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी या मार्गावरील वाहतूक सुरू आहे.प्रश्न : दुर्घटनेवेळी एस. टी.च्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका बजावली?उत्तर : सावित्री नदीवरील दुर्घटनेमुळे एस. टी.चा सर्व कर्मचारीवर्ग हळहळला. प्रत्यक्ष ठिकाणी कर्मचारी, अधिकारी होतेच, परंतु प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी नेटाने पूर्ण केली. माझ्याबरोबर विभागीय सहाय्यक वाहतूक अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, प्रशिक्षणार्थी चालकांचे संपूर्ण पथक, तपासणी पथक, खेड व चिपळूण आगार व्यवस्थापक व त्यांचे सहकारी दुर्घटनास्थळी होते. राजापूर ते आंबेत सागरी मार्गावर तपासणीसाठी कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. अजून आंबेत येथे एक पथक आहे. शिवाय राजापूर, चिपळूण, रत्नागिरी येथे नियंत्रण कक्ष असून, नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. मृत २० प्रवाशांच्या नातेवाईकांना १० हजारांची तत्काळ मदत देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले आहेत.प्रश्न : गाडीत प्रवासी बसल्यानंतर तिकीट रकमेतून प्रवासी विम्याचा एक रूपया घेण्यात येत होता. विम्याची रक्कम प्रवाशांना मिळणार आहे का? उत्तर : प्रवासी गाडीत बसल्यानंतर इच्छितस्थळी उतरेपर्यंत अर्थात् त्या प्रवासापर्यंत विमा असतोे. मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एकूण किती रक्कम द्यावयाची, याबाबत अद्याप कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रश्न : एस. टी.चे एकूण किती नुकसान झाले आहे ? उत्तर : एस. टी.तील अजून नऊ प्रवासी व बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे. फलक व बंपरव्यतिरिक्त काहीच सापडलेले नाही, त्यामुळे एकूण किती नुकसान झाले, हे अजून निश्चित करण्यात आलेले नाही.- मेहरून नाकाडेअद्याप नऊजण बेपत्ताराजापूर - बोरिवली व जयगड - मुंबई गाड्यांमधे प्रवासी, चालक व वाहक मिळून एकूण ३१ जण होते. जयगड-मुंबईमध्ये १२ व राजापूर - बोरिवली गाडीत १९ जण होते. पैकी आतापर्यंत २२ मृतदेह सापडले असले तरी नऊजण बेपत्ता आहेत. दुर्घटनेला आठवडा झाला तरी एकाही गाडीचा शोध लागलेला नाही. तत्पर कामगिरीमहाड येथील दुर्घटनेवेळी सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली. आंबेत येथे अजूनही एस. टी.चे शोधपथक कार्यरत आहे. एस. टी.चे तपासणी पथक, प्रशिक्षणार्थींचे पथक महाडमध्ये आहे. बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देणे, तत्काळ मदत देणे, मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनानंतर घरी पोहोचवणे, ही कामे जबाबदारीने सुरू आहेत.